शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
2
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
3
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
4
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
5
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
6
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
7
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
8
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
9
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
10
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
11
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
12
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
13
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
14
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
15
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
16
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
17
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
18
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
19
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
20
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

भाटियात सौरप्रकाशाचा उजेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

भामरागड तालुक्यातील मिरगुडवंचा ग्रामपंचायत अंतर्गत नारगुंडा हे गाव येते. २५ वर्षांपूर्वी गावापासून एक किलोमीटर अंतरावर भाटिया समाजाचे पाच कुटुंब घर बांधून वास्तव्य करू लागले. तेव्हापासून या गावाला नारगुंडा भाटिया टोला असे ओळखले जाते. कालांतराने येथील नागरिकांना ग्रामपंचायतमार्फत घरकूल मिळाले. रेशनकार्डमुळे या कुटुंबाना धान्यही मिळत आहे.

ठळक मुद्देअतिदुर्गम गाव : सीआरपीएफ व पोलिसांच्या पुढाकाराने नागरिकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्यातील बहुतांश गावे पक्के रस्ते, वीज व अन्य मूलभूत सोयींच्या प्रतीक्षेत आहेत. सायंकाळनंतर अनेक गावांमध्ये अंधार पसरतो. या गावातील नागरिकांना विजेची प्रतीक्षा आहे. २५ वर्षांपूर्वी वसलेल्या भाटियाटोला (नारगुंडा टोला) येथे वीज पोहोचली नाही. नागरिक उजेडाच्या प्रतीक्षेत होते. त्यांची ही प्रतीक्षा सीआरपीएफ व पोलिसांनी गावात सौरदिवे लाऊन पूर्णत्त्वास आणली.
भामरागड तालुक्यातील मिरगुडवंचा ग्रामपंचायत अंतर्गत नारगुंडा हे गाव येते. २५ वर्षांपूर्वी गावापासून एक किलोमीटर अंतरावर भाटिया समाजाचे पाच कुटुंब घर बांधून वास्तव्य करू लागले. तेव्हापासून या गावाला नारगुंडा भाटिया टोला असे ओळखले जाते. कालांतराने येथील नागरिकांना ग्रामपंचायतमार्फत घरकूल मिळाले. रेशनकार्डमुळे या कुटुंबाना धान्यही मिळत आहे. मात्र आजही गावात जाण्यासाठी रस्ता, पाण्याची व विजेची सोय नाही. ही बाब सुरक्षा दलाच्या निदर्शनास आली. तेव्हा सीआरपीएफ ३७ बटालीयनचे कमांडंट श्रीराम मीना यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. त्यांच्या सुचनेनुसार नारगुंडा पोलीस मदत केंद्रात कार्यरत सीआरपीएफ ३७ बटलियनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र सिंह, पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पीएसआय तुकाराम खडके व पोलीस कर्मचारी गावात जाण्याचे ठरविले. सीआरपीएफच्या सिविक एक्शन कार्यक्रम अंतर्गत गावात सौर ऊर्जेवरील दिवे बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सौरदिवे लावले.
गावात सौर ऊर्जेवरील दिवे लागल्याने प्रकाश पोहोचला. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर किमान सौरदिव्यांचा तरी प्रकाश मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल खोदून द्यावे, अशी मागणी याप्रसंगी नागरिकांनी केली.

खांद्यावरून साहित्याची केली वाहतूक
भाटियाटोला गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने सौरदिव्याचे साहित्य पोहोचविण्याचे मोठे आव्हान सीआरपीएफ व पोलीस जवानांसमोर होते. तेव्हा जवानांनी खांद्यावर लोखंडी खांब, सिमेंट, गिट्टी व इतर साहित्य घेऊन पायवाटेने नाला पार करीत थेट गाव गाठले. त्यानंतर गावात सौरदिवे उभे करून नागरिकांना दिलासा दिला.

टॅग्स :Socialसामाजिक