शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून पूल दुरूस्ती

By admin | Updated: July 12, 2015 02:00 IST

रस्ता व पुलाची दुरूस्ती करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रार करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने कोठी व नारगुंडा येथील नागरिकांनी पोलीस मदत केंद्राच्या सहकार्याने पुलांची दुरूस्ती केली.

प्रशासनाचे दुर्लक्ष : कोठी, नारगुंडा गावातील नागरिक व पोलिसांचे सहकार्य
भामरागड : रस्ता व पुलाची दुरूस्ती करण्याबाबत प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रार करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने कोठी व नारगुंडा येथील नागरिकांनी पोलीस मदत केंद्राच्या सहकार्याने पुलांची दुरूस्ती केली.
कोठी हे गाव भामरागड तालुकास्थळापासून सुमारे १८ किमी अंतरावर आहे. कोठीच्या पलिकडेही अनेक गावे आहेत. कोठी येथे आश्रमशाळा असल्याने सभोवतालच्या गावातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी दरदिवशी ये-जा करतात. त्याचबरोबर कोठी हे परिसरातील मोठे गाव असल्याने इतर कामासाठीही नागरिक कोठी येथे येतात. भामरागड या तालुकास्थळावरही कोठी परिसरातील अनेक नागरिक जातात. कोठी गावाजवळ नाला असून या नाल्यावर कमी उंचीचा व रुंदीचा पूल आहे. पाण्याची पातळी वाढल्यानंतर पुलावरून तसेच पुलाच्या दोन्ही बाजुने पाणी वाहते. पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाच्या बाजुची माती वाहून जाते. त्यामुळे पूल व रस्ता यांच्यामध्ये भलामोठा खड्डा पडते.
उन्हाळ्यामध्येच कोठी येथील गावकरी व कोठी पोलीस मदत केंद्राच्या जवानांनी पुलाच्या बाजुला माती टाकून रस्ता सुरळीत केला होता. मात्र यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सदर माती वाहून गेली. त्यामुळे त्याच जागेवर आणखी मोठा खड्डा पडला. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळवूनही खड्डा बुजविण्यास तयार नसल्याने नागरिक व पोलीस मदत केंद्राच्या जवानांनी श्रमदानातून खड्डा बुजविला व मार्ग सुरळीत केला. पाणी आल्यानंतर त्यावरील माती वाहून जाणे ही नित्याचीच बाब बनली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास तयार नाही. पुलावरून पाणी राहत असल्याने या मार्गावरील वाहतुकही अनेक दिवस खोळंबते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
नारगुंडा नाल्यावरील बायपास मार्गावर टाकली माती
नारगुंडा नाल्यावरील पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर पूल अजूनही पूर्ण झाला नाही. वाहनांना जाण्यासाठी बायपास मार्ग तयार करण्यात आला आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात बायपास मार्ग पाण्यामुळे वाहून गेला. रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने नारगुंडा येथील नागरिक व पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी संयुक्त अभियान राबवून सदर बायपास मार्ग दुरूस्त केला. पुलाचे बांधकाम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत असली तरी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.