शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

जंगल क्षेत्रालगतच्या विहिरींसभाेवताली उंच कठडे उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:36 IST

उन्हाळ्यात पाण्याच्या पातळीत घट हाेऊन जंगलातील पाणवठे, वन तलाव व नाले कोरडे पडतात. वनविभाग दरवर्षी कृत्रिम पाणवठे तयार करताे; ...

उन्हाळ्यात पाण्याच्या पातळीत घट हाेऊन जंगलातील पाणवठे, वन तलाव व नाले कोरडे पडतात. वनविभाग दरवर्षी कृत्रिम पाणवठे तयार करताे; परंतु या माध्यमातून आवश्यक प्रमाणात वन्यप्राण्यांची तृष्णा भागविली जात नाही. यामुळे असंख्य वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करीत शेतातील विहिरी, नदी-नाले, तलाव आदींचा आश्रय घेतात.

वन्यप्राणी जंगलाबाहेर पडल्यानंतर विहिरींमधील पाणी पिण्याचा प्रयत्न करतात. यावेळी खोल विहिरीत कोसळून त्यांना इजा होते किंवा गाळात फसून, पाण्यात बुडून मृत्यू होतो. उन्हाळ्यात बरेच शेतकरी कोणत्याही पिकांचे उत्पादन घेत नाहीत. यामुळे शेतात त्यांचे जाणे-येणे राहत नाही. यामुळे विहिरीत प्राणी काेसळून मृत्यू झाला तरी माहीत हाेत नाही.

बहुतांश शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीचे बांधकाम करताना केवळ जमिनीला समांतर बांधकाम केले आहे, तर काही शेतकऱ्यांनी नुसती विहीर खोदून ठेवली; पण बांधकाम केले नाही. यामुळे पाळीव प्राणी, माणसेसुद्धा पडून मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. ही बाब गंभीर असून, यामुळे शेतकरी आणि वनविभागाने पुढाकार घेऊन विहिरींसभाेवताली संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांनी केली आहे.

बाॅक्स

संरक्षक कठडे बांधणे सक्तीचे करा

शेतीला सिंचनाची सोय व्हावी यासाठी शासनाकडून सिंचन विहिरींचा लाभ दिला जाताे. या याेजनेतून शेतकरी विहिरींचे बांधकाम करतात; परंतु अनेक जण विहिरीला कठडे बांधत नाहीत. जमिनीच्या पृष्ठभागाला समांतर विहीर बांधली जाते. त्यामुळे अनेक प्राणी पाण्याच्या शाेधात विहिरीत पडून मृत्युमुखी पडतात. हा धाेका टाळण्यासाठी शासनाने सिंचन विहिरींचे बांधकाम करताना किमान ३ ते ४ फूट उंच संरक्षक कठडे बांधणे अथवा उभारणे शेतकऱ्यांना सक्तीचे करावे, अशी मागणी अजय कुकडकर यांनी केली आहे.