शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:38 IST

गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेले देसाईगंज शहर लगतच्या चारही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या ठिकाणी बाहेरून येणाऱ्यांचा ओघ ...

गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेले देसाईगंज शहर लगतच्या चारही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या ठिकाणी बाहेरून येणाऱ्यांचा ओघ जास्त आहे. अशात कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेल्या नागपूर येथून दररोज किराणा, भाजीपाला व इतरही वस्तूंची आयात हाेत आहे. परंतु याच स्थितीत कोविड-१९ च्या नियमांची सर्रास पायमल्ली करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. देसाईगंज तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

जमावबंदी आदेश असतानाही देसाईगंज शहरासह तालुक्यात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली हाेती. त्यामुळे नागरिकांसाठी ही स्थिती धाेकादायक ठरत हाेती. ही गंभीर समस्या ओळखून लाेकमतने वृत्त प्रकाशित केले. त्या अनुषंगाने १ एप्रिल रोजी देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्या नेतृत्वात कोविड-१९ च्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करीत विनामास्क आढळून आलेल्या व्यक्तींवर प्रत्येकी पाचशे रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच अनावश्यक गर्दी करून नियमांची पायमल्ली करणाऱ्या प्रतिष्ठाने, माॅल्सवर धडक दंडात्मक वसुलीची कारवाई करीत एकाच दिवशी तब्बल २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. या वेळी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा तहसीलदार संतोष महले, पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी एस.एस. सलाम, पोलीस निरीक्षक डाॅ. विशाल जयस्वाल, मुख्याधिकारी डाॅ. कुलभूषण रामटेके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक कुमरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. नारायण मिसार, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच महसूल विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी उचित काळजी घेऊन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या माेहिमेचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

बाॅक्स

बाहेरील व्यापारी धाेकादायक

देसाईगंज येथे बाहेरच्या जिल्ह्यातून माेठ्या प्रमाणात व्यापारी येतात. हे व्यापारी काेराेना विषाणूचा प्रसार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून देसाईगंज येथे येणाऱ्या व्यापाऱ्यांना मज्जाव करावा, अशी मागणीही आता जाेर धरत आहे. तसेच विविध सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने उपाययाेजना कराव्या, अशी मागणीही नागरिक करीत आहेत.