राजाराम परिसरात विजेचा लपंडाव वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:38 AM2021-05-19T04:38:10+5:302021-05-19T04:38:10+5:30

गुडीगुडम : अहेरी तालुक्याच्या राजाराम परिसरात विजेचा लपंडाव वाढला असल्याने नागरिक त्रस्त आहेत. जिमलगटा येथून गुडीगुडम व राजाराम परिसरात ...

The power outage in Rajaram area increased | राजाराम परिसरात विजेचा लपंडाव वाढला

राजाराम परिसरात विजेचा लपंडाव वाढला

Next

गुडीगुडम : अहेरी तालुक्याच्या राजाराम परिसरात विजेचा लपंडाव वाढला असल्याने नागरिक त्रस्त आहेत. जिमलगटा येथून गुडीगुडम व राजाराम परिसरात वीजपुरवठा येथून केला जाते. गुडीगुडम ते जिमलगट्टा या मधील अंतर जवळपास ३० ते ३५ किमी आहे. जिमलगट्टा ३३ केव्ही वीज उपकेंद्र आहे. त्या वीज उपकेंद्रामध्ये जिमलगट्टा, देचलीपेठा, उमानूर, मरपल्ली तसेच रेपनपल्ली, कमलापूर, राजाराम, गुडीगुडम असे तीन ते चार बाजूला वीजपुरवठा करावे लागते व सदर खूप मोठ्या क्षेत्रफळात व्यापला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या परिसराला वीजपुरवठा करणे शक्य नाही व शक्य होत नाही आहे. त्यामुळे वीज उपकेंद्रावर जास्तीच भार पडत आहे.

हलकासा पाऊस आला की वीजपुरवठा खंडित होतो. हलक्याशा वादळाने वीजपुरवठा तासनतास खंडित होतो. पूर्वी कमलापूर परिसरात तीन ते चार वीज कर्मचारी (लाईनमन ) राहत होते. त्यावेळी वीज ग्राहक कमी होते. आता वीज ग्राहक वाढले व वीज कर्मचारी (लाईनमन) कमी झाले.

आत्ता सद्यस्थितीत एक स्थायी कर्मचारी व दोन रोजंदारी कर्मचारी आहेत. वीजपुरवठा घनदाट जंगलातून असल्याने कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्यास विलंब होत असतो त्यामुळे वीजपुरवठा भूमिगत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कमलापूर येते गेल्या दोन वर्षांपूर्वी ३३ केव्ही वीज उपकेंद्र निर्मितीसाठी मंजुरी मिळाली मात्र आत्तापर्यंत थांगपत्ता नाही.

Web Title: The power outage in Rajaram area increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.