शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयाला हेलपाटा मारूनही पांदण रस्ता अपूर्ण

By admin | Updated: May 12, 2016 01:37 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील चाकलपेठ ते वाघदरा पर्यंतच्या २७०० मीटरच्या पांदण रस्त्याचे काम घेण्यात आले होते.

चार वर्षे उलटली : चाकलपेठच्या शेतकऱ्यांची अडचणचामोर्शी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील चाकलपेठ ते वाघदरा पर्यंतच्या २७०० मीटरच्या पांदण रस्त्याचे काम घेण्यात आले होते. या कामाची २४ लाख ६५ हजार ७२१ रूपये अंदाजपत्रकीय किमत आहे. मात्र सदर काम अद्यापही अपूर्ण आहेत. परिणामी शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होत आहे. सदर कामाची चौकशी करून काम पूर्ण करावे, अशी मागणी चामोर्शीतील प्रभाग क्र. १७ चे नगरसेवक अविनाश चौधरी यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. चाकलपेठ ग्रा. पं. अंतर्गत २०११-१२ या वर्षात चालकपेठ ते वाघदरा या २ हजार ७०० मीटर पांदण रस्त्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजुरी मिळाली. त्यानंतर लाखो रूपये खर्च करून मातीकाम करण्यात आले. परंतु सदर काम अर्धवटच झाले. मात्र चार वर्षांचा कालावधी उलटूनही सदर काम पूर्ण करण्यात आले नाही.६ मे २०१४ व १७ जून २०१४ मध्ये तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला. या पत्रामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की, शकुंतला केशरी चौधरी यांच्या शेतापर्यंत मातीकाम झालेले आहे. त्यात ६०० मीटरचा काही भाग काम करणे बाकी आहे. त्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठल्याही हालचाली करण्यात आल्या नाही. १७ मे २०१४ ला मंडळ अधिकारी येणापूर यांना चौकशी अहवाल सादर करण्याबाबत तहसीलदारांचे पत्र मिळूनही कामाची चौकशी झाली नाही. ४ डिसेंबर २०१५ ला तहसीलदारांना पुन्हा अर्ज सादर करण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांना नायब तहसीलदार येणापूर सर्कल यांना ८ डिसेंबर रोजी कार्यवाही करून अहवाल सादर करण्यासंदर्भात पत्र दिले. तरीही चौकशी झाली नाही. २ मे २०१६ ला तहसीलदारांची भेटी घेऊन काम करण्याची मागणी करण्यात आली. परंतु त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्याबाबत वारंवार तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. मात्र अर्धवट रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करावी, मे २०१६ अखेरपर्यंत काम तत्काळ पूर्ण करावे, सदर काम पूर्ण न केल्यास चामोर्शीचे तहसीलदार तसेच अतिक्रमणधारक शेतकऱ्यांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा नगरसेवक अविनाश चौधरी यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)