शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

काव्यातून समाज जीवनाचे वास्तव उलगडले

By admin | Updated: October 27, 2016 01:43 IST

नक्षत्राचे देणं काव्यमंच पुणे, झाडी बोली साहित्य मंडळ व अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ मुख्य शाखा गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने

३० कवींचा सहभाग : राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त कवी संमेलनगडचिरोली : नक्षत्राचे देणं काव्यमंच पुणे, झाडी बोली साहित्य मंडळ व अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ मुख्य शाखा गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने शाखेच्या सामुदायिक प्रार्थना मंदिरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सोमवारी विदर्भस्तरीय कवी संमेलन घेण्यात आले. या संमेलनात विदर्भातील ३० कवींनी सहभाग नोंदवून आपल्या काव्यातून समाज जीवनाचे वास्तव मांडले.कवी संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य खंजेरीकार बंडोपंत बोढेकर होते. उद्घाटन झाडीपट्टीच्या बहिणाबाई अंजना खुणे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भूवैकूंठ अड्याळ टेकडीचे अध्यक्ष डॉ. नवलाजी मुळे, गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, दलित मित्र नानाजी वाढई, पंडित पुडके, आत्माराम आंबोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कवी संमेलनात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील ३० कवींनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. राष्ट्रसंत वंदना गायनाने संमेलनाची सुरुवात झाली. सुरेंद्र इंगळे यांनी ‘शेतकऱ्यांची आत्महत्या’, संगीता धोटे यांनी ‘तुलाच विचारते आई’, खुशालदास कामडी यांनी ‘हुंड्याची करामत’, रमेश भोयर यांनी ‘भिजली आहे धरती’, शालिक दानव यांनी ‘दुष्काळ’ नावाची कविता सादर केली. क्षितीज शिवरकर यांनी ‘तुझी लेक’, माधव कौरासे यांनी ‘पावर’, अमोल मोरे यांनी ‘जगावं तर कसं, मराव तर कसं’, ईश्वर मत्ते यांनी ‘जगणे आजच, उद्या काय रे...’, महादेव हुलके यांनी ‘शेतकऱ्यांची व्यथा’, सतीश लोंढे यांनी ‘राष्ट्रसंत तुकडोजी’, नरहरी रामटेके यांनी ‘पटलं तर घ्या’, वंदना तिवारी यांनी ‘मॉ’, सिद्धार्थ वालदे यांनी ‘काय करेल दैव गती’, पांडुरंग नंदागवडी यांनी ‘सैनिक भाऊ माझा’, एकनाथ बुद्धे यांनी ‘उरी हल्ला’, वसंत कुलसंगे यांनी ‘स्वातंत्र संग्राम’, मधुकर जंबेवार यांनी ‘स्वर्गाचे द्वार’, जयंत येलमुले यांनी ‘संदर्भ’, मुरलीधर बद्दलवार यांनी ‘जंगल माझं गाव’, डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांनी ‘बापू’, देवराव भोगेवार यांनी ‘मॉ-बाप’, अनिल पिट्टलवार यांनी ‘राष्ट्रसंत’, सूरज गोरंतवार यांनी ‘अर्ज’, गुलाब मुळे यांनी ‘इन्कलाबी घाव झाले’ ही कविता सादर केली. चेतन ठाकरे यांनी ‘पूर्वीची माणसं जितकी खरी होती, तितकाच पाऊस सुद्धा खरा होता’ या आशयाची कविता सादर केली. अंजनाबाई खुणे यांनी आपल्या रंगततदार शैैलीत ‘एक तरी झाड लावा व वृद्धाची व्यथा ही वास्तववादी कविता सादर केली. बंडोपंत बोढेकर यांनी ‘गांधीगिरी’ कवितेतून महात्मा गांधींचा त्याग प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा केला. सहभागी सर्वच कवींना ग्रामगीता व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन चेतन ठाकरे यांनी केले. यशस्वीतेसाठी राहूल आंबोरकर, भोगेवार, निकुरे, वेठे व गुरूदेव भक्तांनी सहकार्य केले.