शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

धानपिकावर किडीचा प्रादुर्भाव

By admin | Updated: July 13, 2015 01:54 IST

मागील २५ दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली आहे. दिवसभर तापत असलेल्या उन्हामुळे दमट वातावरण निर्माण होऊन धानपिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

शेतकरी हवालदिल : कीटकनाशकांची करण्यात येत आहे फवारणी
आरमोरी : मागील २५ दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली आहे. दिवसभर तापत असलेल्या उन्हामुळे दमट वातावरण निर्माण होऊन धानपिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत.
मान्सूनच्या पहिल्या पावसातच बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड केली. आरमोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. या तालुक्यातील शेतकऱ्यांनीही धानपिकाचे पऱ्हे टाकले. या भागातील पेरणीचे काम जवळपास १०० टक्के आटोपले आहे. सुरुवातीच्या पावसानंतर पावसाने कायमची दडी मारली. २५ दिवसांचा कालावधी उलटला तरी पाऊस पडला नाही. दमट वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव धानपिकांच्या पऱ्यांवर दिसून येत आहे. पाने खाणारी हिरवी अळी पडली आहे. सदर अळीमुळे पऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरीवर्ग विविध प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत.
पाऊस नसल्याने दूबार पेरणीचे संकट कोसळले असताना कीटकनाशकांचा खर्चही शेतकऱ्यांना उचलावा लागत आहे. काही शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने सदर शेतकरी उसणेवारी करून कीटकनाशकांची खरेदी करीत आहेत. कृषी विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे निर्देश कृषी सहायकांना द्यावे, त्याचबरोबर अनुदानावर कीटकनाशके उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी आरमोरी परिसरातील काही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)