शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पक्षी, प्राण्यांची संख्या वाढली

By admin | Updated: July 12, 2015 02:06 IST

जिल्ह्यात ८० टक्क्यावर जंगल आहे. मात्र या जंगलातील पशु व पक्ष्यांची संख्या सातत्याने कमी होत होती.

गणनेतून पुढे आली आकडेवारी : जंगलाची घनता वाढल्याचा परिणाम
गडचिरोली : जिल्ह्यात ८० टक्क्यावर जंगल आहे. मात्र या जंगलातील पशु व पक्ष्यांची संख्या सातत्याने कमी होत होती. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांत वन विभागाने वन व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून प्लाँटेशन कार्यक्रम राबविल्याने असलेल्या जंगलाची घनता वाढविण्यात वन विभागाला मोठे यश आले. त्यामुळे या जंगलाकडे पाठ फिरविलेले प्राणी व पक्षी पुन्हा सुरक्षित जंगल म्हणून गडचिरोली जिल्ह्यात वास्तव्याला आलेले आहेत, असे निरीक्षण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदविलेले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, आलापल्ली, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, चामोर्शी, कोरची, कुरखेडा, धानोरा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. मात्र या जंगलात पुर्वी माणसांचा वावर वाढायला लागला होता. गेल्या २- ३ वर्षात वन व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून दरवर्षी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यामुळे असलेल्या जंगलाची घनता वाढण्यास मदत झाली. त्यानंतर या जंगलात पशु व पक्ष्यांचा वावर वाढू लागला आहे.
नुकत्याच झालेल्या प्राणी गणनेत आलापल्ली वन विभागात चितळ, सांबर, उदमांजर, जंगली माकडे, रानडुक्कर, गवा, निलगाय, उडणारी खार व मोरांची संख्या वाढल्याची माहिती पुढे आली आहे.
आलापल्ली वन परिक्षेत्रात रानकुत्रे ४, अस्वल १, कोल्हे २७, रानमांजर ५, चितळ ५०१, भेडकी ५, रानडुक्कर २९४, निलगाय ३६, मोठी मांजर, खवल्या मांजर १, मोर ७५ आढळल्याचे वन्यप्रेमीजणांचे म्हणणे आहे. वन विभागाची आकडेवारी यापेक्षा वेगळी असू शकते. मात्र जिल्ह्यात गेल्या काही वर्षात प्राणी व पक्ष्यांची संख्या जंगलामध्ये वाढलेली आहे. याबाबीला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. चामोर्शी वन परिक्षेत्रात लोकसहभागातून काम करण्यात आल्याने प्राण्यांची संख्या वाढल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी शंकर गाजर्लावार यांनी म्हटले आहे.