शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
4
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
5
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
6
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
7
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
8
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
9
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
10
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
11
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
12
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
13
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
14
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
15
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
16
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
17
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
18
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
19
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
20
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; अहेरीत तीन तिघाडा, काम बिघाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

वास्तविक गेल्या १० वर्षांपासून आमदारकी मिळण्यापासून हुलकावणी बसत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा यांना यावेळची निवडणूक जिंकणे फारसे कठीण नव्हते. परंतू या भागाच्या विकासासाठी मंत्रीपद मिळावे असे म्हणत ते भाजपकडे आस लावून बसले होते. त्यात झालेला टाईमपास त्यांना खूप अखरणारा ठरला.

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अहेरी मतदार संघातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा परंपरागत लढतीत यावेळी काँग्रेसने उडी घेऊन दुहेरी लढतीला तिहेरी केले. याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला असलेल्या पेसा क्षेत्रातील ग्रामसभांच्या पाठिंब्यामुळे कोणत्या उमेदवाराचे विजयाचे गणित बिघडणार याचा अंदाज बांधणे राजकीय धुरंधरांसाठी कठीण झाले आहे. तरीही मतांच्या विभागणीचा फायदा भाजपला होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.
वास्तविक गेल्या १० वर्षांपासून आमदारकी मिळण्यापासून हुलकावणी बसत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा यांना यावेळची निवडणूक जिंकणे फारसे कठीण नव्हते. परंतू या भागाच्या विकासासाठी मंत्रीपद मिळावे असे म्हणत ते भाजपकडे आस लावून बसले होते. त्यात झालेला टाईमपास त्यांना खूप अखरणारा ठरला. त्याच गडबडीत काँग्रेसने आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते, माजी आमदार दीपक आत्राम यांना काँग्रेसच्या तिकीटवर उभे करून आघाडीत बिघाडी केली.
तिकडे विद्यमान आमदार राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची उमेदवारी ऐनवेळी जाहीर करून भाजपने आपली खेळी यशस्वी केली. आता या तीनही उमेदवारांच्या तुल्यबळ लढतीमुळे अहेरी क्षेत्रातील वातावरण तापले आहे.
अम्ब्रिशराव यांनी पालकमंत्री म्हणून काम करताना विविध कामांसाठी बराच निधी खेचून आणला. पण सामान्य माणसाशी नाळ जोडण्याचे टेक्निक त्यांना फारसे जमले नाही. शेवटच्या टप्प्यात तो प्रयत्नही त्यांनी केला. मात्र हे काम आधी केले असते तर त्यांना अधिक फायदा झाला असता. दीपक आत्राम यांनी आपले खंदे समर्थक असलेले जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मदतीने बऱ्याच भागात आदिवासी विद्यार्थी संघाचे जाळे विणले. तरी पूर्ण मतदार संघ काबिज करणे त्यांना शक्य झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेटवर्क त्या तुलनेत जास्त आहे. अशा तुल्यबळ लढतीत कोणीही खूप फरकाने बाजी मारेल याची शक्यता नाही. एकूणच प्रत्येकाला आपापली ताकत पणाला लावावी लागत आहे. अशा अटीतटीच्या वातावरणात काँग्रेसच्या कोणत्या मोठ्या नेत्याची सभा झालेली नाही. राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींची एक सभा झाली.
शुक्रवारी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा अहेरीत होणार आहे. या सभेनंतर अहेरीत कोणता माहौल तयार होतो यावरच विजयाचे गणित ठरणार आहे.

टॅग्स :aheri-acअहेरी