शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक साधनसंपत्तीतून रोजगार निर्मिती करू या

By admin | Updated: August 27, 2016 01:19 IST

आपला गडचिरोली जिल्हा वनसंपदा, खनिज संपत्ती, जल, जमीन या नैसर्गिक साधनसंपत्तीने ओतप्रोत भरलेला आहे.

पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : मेक इन गडचिरोलीचा वर्षपूर्ती सोहळागडचिरोली : आपला गडचिरोली जिल्हा वनसंपदा, खनिज संपत्ती, जल, जमीन या नैसर्गिक साधनसंपत्तीने ओतप्रोत भरलेला आहे. मात्र जिल्हा निर्मितीच्या ३४ वर्षानंतरही जिल्हा विकासापासून कोसोदूर आहे. नोकरी मिळविण्याचा अट्टाहास न करता, विपूल नैसर्गिक साधनसंपत्तीतून रोजगार निर्मितीसोबतच जिल्हा विकास करू या, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.गतवर्षी २६ आॅगस्ट २०१५ रोजी जिल्हा वर्धापन दिनाच्या पर्वावर मेक इन गडचिरोली या विकासात्मक संकल्पपूर्तीचा शुभारंभ आमदार डॉ. देवराव होळी यांच्या संकल्पनेतून करण्यात आला. या संकल्पनेचा वर्षपूर्ती सोहळा शुक्रवारी येथील क्रीडा प्रबोधिनीत आयोजित करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून पालकमंत्री आत्राम बोलत होते.कार्यक्रमाध्यक्ष अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर आमदार डॉ. देवराव होळी, प्रकाश गेडाम, प्रमोद पिपरे, सुधाकर येनगंधलवार, प्रतिभा चौधरी, स्वप्नील वरघंटे, डॉ. मुनघाटे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पालकमंत्री आत्राम म्हणाले की, मेक इन गडचिरोलीच्या माध्यमातून मागील वर्षभरात केलेले उपक्रम, त्यातील उपलब्धी व या पुढील वर्षाच्या उपक्रमाचे स्वरूप या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणा सर्वापर्यंत पोहोचविण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील वनौषधीचा वापर करून ग्रामीण भागात वैदूंकडून आरोग्यबाबत औषधोपचार केला जात होता. मेक इन गडचिरोलीच्या माध्यमातून वैदूंना शास्त्रशुध्द प्रशिक्षण देऊन आरोग्य वातावरण व औषधी यातील साधर्म्य ओळखून तज्ज्ञ डॉक्टरांनी वैदूंना प्रशिक्षीत केले. आरोग्यसेवेसाठी उत्तम डॉक्टर उपलब्ध करून वैदूंना सदर कार्यक्रमात प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अशाच प्रकारे येथील उपलब्ध असलेल्या खनिजावर आधारीत उद्योग सुरू झाल्यास जवळपास १० हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. या दृष्टीकोणातून सुरजागड येथे लोहखनिज उत्खनन करण्याचे काम कंपनीमार्फत प्रगतीपथावर सुरू आहे. येथे येणाऱ्या कंपनीचे मनोबल वाढविण्यासाठी स्थानिकांचे सहकार्य मोलाचे ठरणार आहे, असे पालकमंत्री आत्राम यावेळी म्हणाले. संचालन रमेश भुरसे यांनी केले. (प्रतिनिधी)