शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

‘प्रतिपालकत्वा’तून मिळणार निराधार मुलांना कौटुंबिक आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:36 AM

गडचिरोली : अनाथ किंवा कुटुंब असूनही निराधार झालेल्या मुलांना कुटुंबाचे प्रेम, आधार, वात्सल्य मिळावे यासाठी राज्याच्या महिला व बालविकास ...

गडचिरोली : अनाथ किंवा कुटुंब असूनही निराधार झालेल्या मुलांना कुटुंबाचे प्रेम, आधार, वात्सल्य मिळावे यासाठी राज्याच्या महिला व बालविकास विभागामार्फत ‘प्रतिपालकत्व’ योजना राबविली जाणार आहे. जे कुटुंब अशा मुलांचा काही दिवसांसाठी सांभाळ करण्यास तयार होतील, त्यांना प्रोत्साहन म्हणून शासनाकडून विशिष्ट रक्कमही दिली जाणार आहे.

सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली ही प्रतिपालकत्व (Foster Care) योजना अनाथ, निराधार बालकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बालकांचा सर्वांगीण विकास त्याच्या कुटुंबातच होत असतो. पण अनाथ व निराधार बालकांना कुटुंबाचे प्रेम न मिळाल्यास त्यांच्या मानसिक विकासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा बालकांना कुटुंब मिळवून देण्यासाठी ही योजना अंमलात आणली जात आहे.

६ ते १० वर्ष, ११ ते १५ वर्ष आणि १५ ते १८ वर्ष अशा तीन गटांतील निराधार मुलांला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तथापि, सुरुवातीला ६ ते १० वर्ष वयोगटातील मुलांनाच याचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. आई-वडील नसलेली किंवा असूनही ते मुलाचा सांभाळ करण्यास सक्षम नाहीत अशा मुलांची निवड जिल्हास्तरीय बालकल्याण समिती करून त्यांची या योजनेसाठी निवड होईल.

कोण घेऊ शकतील पालकत्व?

प्रतिपालकत्व योजनेअंतर्गत इच्छुक कुटुंबांना समितीने निवडलेल्या मुलांपैकी कोणालाही किमान एक वर्ष आणि जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत पालकत्व द्यायचे आहे. यादरम्यान त्या मुलाचा संपूर्ण खर्च त्या कुटुंबाला करावा लागेल. विशेष म्हणजे घरातील सदस्याप्रमाणे त्याला प्रेमही द्यावे लागेल. यासाठी मुलाचा खर्च म्हणून दोन हजार रुपये महिना त्या कुटुंबाला शासनाकडून दिला जाईल. बालकल्याण समिती वेळोवेळी जाऊन त्या मुलाचा योग्य पद्धतीने सांभाळ होत आहे किंवा नाही याची खात्री करेल. ज्या कुटुंबांना मुलांचे पालकत्व घ्यायचे आहे त्यांना www.wcdcommpune.org या संकेतस्थळावर अर्ज करावे लागतील. विशेष म्हणजे कोणाला हे पालकत्व घेता येईल त्याच्या काही अटीही घालून दिल्या आहेत.

जिल्ह्यात होणार ४० बालकांची निवड

प्रतिपालकत्व योजनेसाठी जिल्ह्यातील ४० बालकांची निवड केली जात आहे. या योजनेअंतर्गत अनाथ मुलांचे पालकत्व घेण्यासाठी इच्छुक कुटुंबांनी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, बॅरेक क्र.१, जिल्हाधिकारी कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले व संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर किंवा कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नारायण परांडे यांनी केले आहे.