शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळीत ०.५२ मीटरने घट

By admin | Updated: May 20, 2015 02:11 IST

२०१४ च्या पावसाळ्यात सरासरी कमी पर्जन्यमान झाल्याने त्याचा सरळ परिणाम भूजल पातळीवर पडला असून जिल्ह्यातील भूजलाची पातळी सरासरी ०.५२ मीटरने घटली आहे.

गडचिरोली : २०१४ च्या पावसाळ्यात सरासरी कमी पर्जन्यमान झाल्याने त्याचा सरळ परिणाम भूजल पातळीवर पडला असून जिल्ह्यातील भूजलाची पातळी सरासरी ०.५२ मीटरने घटली आहे.
भूजल पातळीचे मापन करण्यासाठी जिल्हा स्तरावर स्वतंत्र भूजल सर्वेक्षण विभाग स्थापन करण्यात आला आहे. या विभागाच्या वतीने दर तीन महिन्यांनी जिल्हाभरातील काही निवडक विहिरींचे सर्वेक्षण करून भूजल पातळी तपासली जाते. या विभागाच्या वतीने मार्च २०१५ मध्ये बाराही तालुक्यातील १९२ विहिरींची तपासणी झाली. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील १०, आरमोरी आठ, देसाईगंज सात, कुरखेडा १५, कोरची सहा, धानोरा १२, चामोर्शी ११, मुलचेरा पाच, एटापल्ली १२, अहेरी ११, भामरागड सहा व सिरोंचा तालुक्यातील नऊ विहिरींचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षात या विहिरींमधील पाण्याची सरासरी पातळी ६.५९ मीटर होती. मार्च २०१५ मध्ये पाण्याची पातळी ६.७ मीटरवर आली आहे. म्हणजेच पाण्याची पातळी ०.५२ मीटरने घटली असल्याचे निदर्शनास येते.
सर्वेक्षण करण्यात आलेल्या गडचिरोली तालुक्यातील दहा विहिरींपैकी दोन विहिरीतील पाण्याच्या पातळी घट तर आठ विहिरींतील पाण्याच्या पातळी वाढ झाली आहे. आरमोरी तालुक्यातील आठ पैकी दोन विहिरींमध्ये घट तर सहा विहिरींमध्ये वाढ झाली आहे. देसाईगंज तालुक्यातील तीन विहिरींमध्ये घट तर चार विहिरींमध्ये वाढ, कुरखेडा तालुक्यातील चार विहिरींच्या पाण्याच्या पातळी घट तर ११ मध्ये वाढ झाली आहे. कोरची तालुक्यातील सहा पैकी सर्वच विहिरींत पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. धानोरा तालुक्यातील एक, चामोर्शी तालुक्यातील दोन, अहेरी दोन, एटापल्ली तीन, सिरोंचा तालुक्यातील चार सर्वेक्षण विहिरींतील पाण्याची पातळीमात्र घटली असल्याचे दिसून येते.
जिल्ह्याच्या प्रत्येक भागात असमान प्रमाणात पाऊस पडते. त्यामुळे काही तालुक्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. तर काही तालुक्यांमधील मात्र ही पातळी घटली आहे. बहुतांश ठिकाणची पाणी पातळी वाढली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या उन्हाळ्यात सरासरी ०.५२ मीटरने पाण्याची पातळी घटली आहे. (नगर प्रतिनिधी)