शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी अहवालात जिवंत वृक्षांची माहिती गुलदस्त्यातच

By admin | Updated: April 27, 2017 01:11 IST

विविध शासकीय, निमशासकीय व सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून करण्यात आलेल्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या....

आॅक्टोबरनंतर अहवालच गेला नाही : मेमध्ये पुन्हा गणना करणार; नगर पालिका क्षेत्रातील रोपांची अवस्था वाईटच गडचिरोली : विविध शासकीय, निमशासकीय व सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून करण्यात आलेल्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमानंतर शासनाकडे लावलेल्या व जिवंत असलेल्या झाडाच्या अहवालाची माहिती आॅक्टोबर २०१६ मध्ये देण्यात आली होती. मात्र त्यानंतर शासनाकडे याबाबतचा कोणताही अहवाल पाठविण्यात आला नाही. आगामी मे महिन्यामध्ये पुन्हा गेल्यावर्षीच्या वृक्षाची गणना करून अहवाल सादर केला जाणार आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे विविध यंत्रणांनी लावलेले किती रोपे सद्य:स्थितीत जिवंत आहेत, ही बाब गुलदस्त्यातच आहे. जुलै २०१६ मध्ये लावण्यात आलेल्या वृक्षाची आॅक्टोबर २०१६ मध्ये माहिती घेऊन अहवाल पाठविण्यात आला. या अहवालात बऱ्याच शासकीय यंत्रणांनी ९५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचे सरकारला कळविले. त्यामुळे आता मे महिन्याच्या अहवालावर पुढची भिस्त अवलंबून राहणार आहे. देसाईगंज तालुक्यात २०१६-१७ या वर्षात ९० हजार रोपांची लागवड करण्यात आली. आॅक्टोबर २०१६ पर्यंत ८८ हजार रोेपे जिवंत असल्याची माहिती देण्यात आली होती. आता किती रोपे जिवंत आहेत, याची माहिती वन विभागाकडे नाही. मे महिन्यात गणना होणार आहे. तेव्हा माहिती कळेल, असे वन विभागाच्या सूत्रांनी लोकमतला सांगितले. देसाईगंज नगर पालिकेला २ हजार रोपांच्या लागवडीचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यांनी १ हजार रोपांची लागवड केली. एक हजार शहरातील शाळा व महाविद्यालयांना देण्यात आली. त्यापैकी १ हजार ५४४ रोपे जिवंत असल्याचे आॅक्टोबर २०१६ च्या अहवालात नमूद करण्यात आले होते. सद्य:स्थितीत नगर पालिकेकडे गतवर्षीच्या वृक्षारोपणातील रोपांच्या स्थितीची माहिती उपलब्ध नाही. पंचायत समितीनेही महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शंकरपूर व शिवराजपूर ग्राम पंचायतींना २ हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम दिला. त्यापैकी १ हजार ९६८ वृक्ष जिवंत असल्याचे सांगण्यात आले. ही सर्व माहिती कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात वृक्षारोपण करण्यात आलेल्या जागेवर वृक्षच राहिलेले नाही. पाण्याचा अभाव, वृक्ष जगविण्यासाठी करावयाचे नियोजन यामुळे वृक्ष लागवड कार्यक्रमाचे सध्या बारा वाजले आहे. देसाईगंज नगर पालिकेच्या हद्दीत बोटावर मोजण्याइतकेच रोपटे जिवंत राहिलेले आहे. दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत गडचिरोली नगर पालिकेच्या वतीने जुलै महिन्यात एकूण १ हजार ६५० रोपे आयटीआय बायपास रोड, गोकुलनगर, खरपुंडी मार्गावरील घनकचरा व्यवस्थापन परिसर, शहराच्या अनेक वॉर्डातील ओपन स्पेस व रस्त्याच्या कडेला लावण्यात आले. यापैकी ९५० म्हणजे ५७ टक्के वृक्ष जिवंत आहेत, असे दोन महिन्यापूर्वी पालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले, अशी माहिती न. प. प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र गडचिरोली शहरात पाहणी केली असता, संरक्षण कठड्याअभावी निम्मे वृक्ष नष्ट झाल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली पालिकेने निविदा प्रक्रिया राबवून रोपवाटिकेतून १ लाख १० हजार रूपये किंमतीच्या रोपांची खरेदी केली होती. तर काही रोपे सामाजिक वनीकरण विभागाकडून मिळविली होती. सर्वेक्षणानंतर दोन ते अडीच महिन्यात उष्णतामानाने पुन्हा बरीचशी रोपे करपली असल्याचे दिसून येत आहे. एकूणच वृक्ष लागवडीची शहरी भागात बोजवारा उडाला आहे.