शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

बंगाली समाजाला जात प्रमाणपत्र द्या

By admin | Updated: July 24, 2015 01:30 IST

विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मागील ५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बंगाली समाजाच्या नागरिकांना जात प्रमाणपत्र देण्यात यावे, ...

खासदारांतर्फे लोकसभेत निवेदन सादर : इतर राज्यात दिल्या जात आहेत सोयीसवलती
गडचिरोली : विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मागील ५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बंगाली समाजाच्या नागरिकांना जात प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी बुधवारी खा. अशोक नेते यांनी लोकसभेत केली.
या मागणीकडे त्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधतांना सांगीतले की,देशातील पश्चिम बंगाल, त्रिपुरा, ओरीसा, आसाम, मनिपूर, मेघालय या राज्यांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या बंगाली समाजाला १९५० पासूनचे वास्तव्य प्रमाणपत्र दिले जाते. या प्रमाणपत्राच्या आधारावर बंगाली बांधव त्या भागात विविध सोयीसुविधांचा लाभ घेतात. मात्र महाराष्ट्रातील बंगाली समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले नाही. त्यामुळे या समाजाला शासनाच्या बहुतांश सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. १९६४ ते १९८२ पर्यंत १८ राज्यांमध्ये जातीचे प्रमाणपत्र दिल्या जात होते. मात्र महाराष्ट्र शासनाने आमच्या सूचीत तुमच्या जातीचा उल्लेख नाही, असे सांगून १९८२ पासून जात प्रमाणपत्र देणे बंद केले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात वास्तव्याला असलेल्या बंगाली समाजासमोर अडचणी निर्माण झाल्या आहे. यासंदर्भात अनेक वेळा बंगाली बांधवांनी सनदशिर मार्गाने आंदोलन केलीत, अशी माहितीही खा. अशोक नेते यांनी लोकभेत दिली. त्यामुळे बंगाल, ओरिसा, छत्तीसगड राज्याच्या धर्तीवर बंगाली समाजाला गडचिरोली जिल्ह्यातही प्रमाणपत्र देऊन शासनाच्या सोयीसुविधा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी लोकसभेत केली. मात्र लोकसभेत गोंधळ झाल्यामुळे नेते यांच्या चर्चेनंतर या प्रश्नावर केंद्र सरकारला उत्तर देता आले नाही, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. यापूर्वीही गेल्या अधिवेशनात अशोक नेते यांनी बंगाली बांधवांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते, हे विशेष. (जिल्हा प्रतिनिधी)