शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या अडेलतट्टू धोरणाने पेसा क्षेत्रातील ग्रामसभा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

वनहक्क कायदा व पेसाअंतर्गत आदिवासी बांधवांना तसेच ग्रामसभांना वनोपज संकलित करून त्याची विक्री करण्याच्या कामास आलापल्ली येथील वन विभागाच्या कार्यालयाकडून मनाई केली जात आहे. वनोपजाबाबत या अधिकाराची अंमलबजावणी करण्यात उपवनसंरक्षकाकडून उदासीनता दिसून येत आहे, असे गरंजी ग्रामसभेने म्हटले आहे.

ठळक मुद्देबांबू कटाई थंडबस्त्यात । वनोपज संकलित व विक्री करण्यास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली/अहेरी : दुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना विकासाच्या प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने कल्याणकारी तरतूद केली आहे. त्याअनुषंगाने वनहक्क व पेसा कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार गौण वनोपज संकलीत करून विक्रीचा अधिकार ग्रामसभांना प्रदान करण्यात आला आहे. मात्र वन विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे ग्रामसभांच्या या हक्कावर गदा येत असल्याने ग्रामसभा अडचणीत सापडल्या आहेत.
वनहक्क कायदा व पेसाअंतर्गत आदिवासी बांधवांना तसेच ग्रामसभांना वनोपज संकलित करून त्याची विक्री करण्याच्या कामास आलापल्ली येथील वन विभागाच्या कार्यालयाकडून मनाई केली जात आहे. वनोपजाबाबत या अधिकाराची अंमलबजावणी करण्यात उपवनसंरक्षकाकडून उदासीनता दिसून येत आहे, असे गरंजी ग्रामसभेने म्हटले आहे. वनहक्क कायद्यानुसार गरंजी ग्रामसभेने सुक्ष्म आराखडा सादर करून तो कार्यान्वित करण्याबाबत नोव्हेंबर २०१९ मध्ये मुख्य वनसंरक्षक गडचिरोली व उपवनसंरक्षक आलापल्ली यांना कळविले. आलापल्लीच्या उपवनसंरक्षकांनी ग्रामसभेला वनोपज वाहतुकीचा परवाना मिळणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पेसा व वनहक्क क्षेत्रातील शेकडो आदिवासी बांधव पारंपारिक व्यवसायापासून वंचित राहण्याची शक्यता बळावली आहे.
आलापल्ली वन विभागातील मुखडी टोला, तलवाडा, मिरकल, गुरजा, कासमपल्ली आदी आदिवासी बहुल गावांना पेसा कायद्यानुसार वनोपज गोळा करून त्याची विक्री करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
या गावांनी यापूर्वी बांबू व इतर वनोपज संकलीत करून त्याची विक्री केली आहे. यावर्षीही वनहक्कानुसार बांबू कटाई करून ग्रामस्थांना रोजगार देण्याचे नियोजन ग्रामसभांचे होते. मात्र वन विभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे तलवाडा ग्रामसभेचे अध्यक्ष मंगू पोटाडी यांनी म्हटले आहे.
आलापल्ली वन विभागातील अगरबत्ती प्रकल्पांना बांबूचा पुरवठा करावयाचा असल्याने वन विभागाने ग्रामसभेबाबत अशी भूमिका घेतल्याची चर्चा आहे.

सध्या मी बाहेरगावी आहे. सदर प्रकरणाबाबत आपल्याला सविस्तर माहिती कार्यालयात आल्यावर देण्यात येईल.
- चंद्रकांत तांबे, उपवनसंरक्षक
वन विभाग आलापल्ली

टॅग्स :forest departmentवनविभाग