शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

धरणाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

By admin | Updated: January 28, 2016 01:10 IST

गोदावरी नदीवर मेडिगट्टा-कालेश्वर धरणाचे काम महाराष्ट्राच्या सीमेला लागून करण्यात येत आहे.

सिरोंचात निघाला मोर्चा : मेडिगट्टा-कालेश्वर धरण कामाचे सर्वेक्षण बंद करासिरोंचा : गोदावरी नदीवर मेडिगट्टा-कालेश्वर धरणाचे काम महाराष्ट्राच्या सीमेला लागून करण्यात येत आहे. या कामाकरिता गेल्या काही दिवसांपासून सिरोंचापासून २२ किमी अंतरावर पोचमपल्ली भागात सर्वेक्षण दोन्ही राज्याचे अधिकारी संयुक्तपणे करीत आहे. या प्रकल्पामुळे २२ गावे बाधित होणार असल्याने या भागातील शेतकऱ्याचा या प्रकल्पाला प्रचंड विरोध आहे. या विरोधात बुधवारी सिरोंचा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा नेऊन रोष व्यक्त केला. या मोर्चाचे नेतृत्व मेडिगट्टा धरण विरोधी संघटनेच्या किसान आघाडी संघटनेचे अध्यक्ष मधुसुधन आरवेली, कोमरे वेंकन्ना, लग्गा सत्यम, भंडारी समय्या, नागेश गागापुरम, सतीश भोगे आदींनी केले. यावेळी मोर्चेकऱ्यांची माजी आ. पेंटारामा तलांडी यांनीही भेट घेऊन मोर्चाला आपला पाठिंबा दर्शविला. सिरोंचा तालुक्यातून गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती या तीन नद्या वाहतात. आॅगस्ट महिन्यात दरवर्षी सिरोंचा तालुक्यातील २२ ते २३ गावांना पुराचा फटका बसतो. तेलंगणाच्या प्रस्तावित असलेल्या मेडिगट्टा-कालेश्वर धरणामुळे या परिसरातील नलीकुडा, कोत्तापल्ली, चुनामचन, वागू, पोचमपल्ली, वडधम, आईपेठा, तुमनूर, पेंटीपाका, लंबडपल्ली, क्रिष्णापूर, आरडा, राजन्नापल्ली, जानमपल्ली, चिंतलपेठ, रामक्रिष्णापूर, सिरोंचा, गर्कापेठा, गोल्लागुडम, टेकडाचेक, जाफ्राबाद चेक, मुकेला आदी २१ गावांतील अंदाजे ३०७० एकर (१२२७.३१ हेक्टर आर) शेत जमिनीसह घरे पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्राच्या सिरोंचा तालुक्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान या धरणामुळे होणार आहे. या भागात कापूस, ज्वारी, मिरची आदी पिके घेतले जातात. शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त होणार असल्याचे या मोर्चाला मार्गदर्शन करताना शेतकरी नेते मधुसुदन आरवेली यांनी सांगितले. या मोर्चादरम्यान के.सी.आर. हाय हाय, सिरोंचा को डुबने से बचाओ, पालकमंत्री निंद से जागो, मेडिगट्टा-कालेश्वर बॅरेज बंद करा, महाराष्ट्र गर्व्हनर हाय हाय, जय जवान, जय किसान, वंदे मातरम, गर्व्हनर को हटाओ सिरोंचा बचाओ, अशा प्रचंड घोषणा देण्यात आल्या. मोर्चा स्थानिक शेतकरी भवनातून तहसील कार्यालयावर धडकला. नायब तहसीलदार सत्यनारायण कडार्लावार यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी शेकडोंच्या संख्येत शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)