शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राेजी गेली तरी अडीच लाख कुटुंबांना मिळणार राेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:37 IST

काेराेना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे ग्रामीणसह शहरी भागातील अनेक नागरिकांचा राेजगार ...

काेराेना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासनाने राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे ग्रामीणसह शहरी भागातील अनेक नागरिकांचा राेजगार गेला आहे. १५ दिवस घरी बसून राहण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. हा वर्ग हातावर आणून पानावर खाणारा असल्याने मजुरी बुडाल्यानंतर उपासमारीचे संकट या वर्गावर येणार हाेते. यातून या वर्गाला थाेडा दिलासा मिळावा, यासाठी राज्य शासनाने एक महिन्याचे धान्य माेफत देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाभरात एकूण २ लाख २६ हजार ५८८ कार्डधारक आहेत. त्यापैकी बीपीएल, अंत्याेदय, अन्न सुरक्षा प्राधान्य कुटुंबाचे १ लाख ९१ हजार १३ कार्ड आहेत. या सर्वांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून धान्य दिले जाते. तर २८ हजार ८७८ एपीएल कुटुंब आहेत. तर ६ हजार ६९७ कुटुंबांकडे शुभ्र कार्ड आहे. या कुटुंबांना स्वस्त धान्याचा लाभ दिला जात नाही. मात्र संचारबंदीसंदर्भात काढलेल्या निर्णयामध्ये रेशनकार्ड नसला तरी मागणी करेल त्या कुटुंबाला माेफत धान्य दिले जाणार आहे. म्हणजेच जवळपास अडीच लाख कुटुंबांना माेफत धान्य याेजनेचा लाभ मिळणार आहे.

बाॅक्स......

गहू व तांदळाचाच पुरवठा करावा

मागील काही महिन्यांमध्ये गडचिराेली जिल्ह्यात गहू व तांदळासाेबतच मक्याचा पुरवठा करण्यात आला हाेता. मात्र मक्याला अनेक नागरिकांची नापसंती दिसून आली. अनेकांनी मका जनावरांना खाऊ घातला तर काहींनी मक्याच्या बदल्यात पाेहे, मुरमुरे खरेदी केले. संचारबंदीमुळे नागरिकांना घरी राहावे लागणार आहे. त्यामुळे गहू व तांदळाचाच पुरवठा करण्याची मागणी आहे.

काेट ........

शासनाने निर्णय घेतला नसता तरी नागरिकांना नियमित तांदूळ व गहू मिळणारच हाेते. मजुरी बुडाल्याने हजाराे रूपयांचा ताेटा झाला आहे. शासन मात्र महिन्याचे केवळ पाच किलाे गहू देऊन गरिबांची थट्टा करीत आहे. मजुरी बुडालेल्या व्यक्तीला ठाेस मदत करण्याची गरज हाेती. - राजेंद्र थाेरात, नागरिक

काेट ...

संचारबंदी आणखी किती दिवस चालणार हे अजून स्पष्ट नाही. शासनाने केवळ एक महिन्याचे धान्य माेफत देण्याचा निर्णय घेतला आहे. माेफत धान्याऐवजी नागरिक व मजुरांना थेट मदत करण्याची गरज आहे. - राजू ठाकरे, नागरिक

जिल्ह्यातील कार्डधारकांची संख्या - २,२६,५८८

तालुकानिहाय कार्ड

गडचिराेली २८,३८३

धानाेरा १६,४९७

चामाेर्शी ४१,०३७

मुलचेरा १०,७३६

देसाईगंज २०,४७९

कुरखेडा १९,९७०

काेरची १०,१०५

आरमाेरी ६,१७१

अहेरी २९,३२९

एटापल्ली १४,७९९

सिराेंचा २१,१९२

भामरागड ७,५९६

एकूण २,२६,५८८