शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

पऱ्हे करपताहेत; शेतकरी मेटाकुटीस

By admin | Updated: July 16, 2015 02:09 IST

यंदा पावसाळ्याच्या सुरूवातीला मृग नक्षत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. पहिल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी चिखलणी करून खरीप हंगामातील धानाची पेरणी केली.

गडचिरोली : यंदा पावसाळ्याच्या सुरूवातीला मृग नक्षत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली. पहिल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी चिखलणी करून खरीप हंगामातील धानाची पेरणी केली. मात्र पेरणीनंतर १५ ते २० दिवस पावसाने दडी मारली. त्यानंतर जिल्ह्याच्या काही भागात दोन दिवस हलकासा पाऊस बरसला. आता निसर्गाने डोळे वटारले असून पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकलेले धानाचे पऱ्हे करपत असल्याचे चित्र आहे. ज्या शेतकऱ्यांकडे थोड्याफार प्रमाणात सिंचन सुविधा आहे. अशा शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या साहाय्याने कसेबसे पऱ्हे वाचविले. मात्र पाण्याचे स्त्रोतही कोरडे झाल्याचे रोवणीलायक पऱ्हे होऊनही दमदार पावसाअभावी जिल्हाभरातील रोवणीचे काम खोळंबले आहे. याशिवाय काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आला असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
धान बियाणे उगवलेच नाही : आरमोरी शहरालगतच्या शेतात काही शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे टाकले. तसेच काही शेतकऱ्यांनी धान पिकाच्या आवत्याची पेरणी केली. मात्र पावसाने दोन आठवड्यापासून उसंत घेतल्यामुळे या भागातील शेतजमिनीतून धान बियाण्यांचे अंकूर अत्यल्प प्रमाणात उगवले आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतातील पऱ्हे व आवत्या पावसाअभावी उगवलेच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर पऱ्हे व आवत्याची दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.
देसाईगंज तालुक्यातील विसोरा भागात शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धानाची पेरणी केली आहे. मात्र पावसाअभावी धानाच्या पऱ्ह्याची वाढ खुंटली असल्याने विहित वेळेत रोवणीचे काम होणार नसल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.
१५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पऱ्हे वाचविण्यासाठी तसेच रोवणीसाठी देसाईगंज तालुक्यातील विसोरा भागातील शेतकरी मोटारपंपाच्या सहाय्याने शेतीला पाणी पुरवठा करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र गेल्या आठवडाभरापासून वीज पुरवठ्याचे अघोषित भारनियमन सुरू असल्याने शेतकऱ्यांचे मोटारपंपही निकामी झाले आहेत. मोटारपंप असूनही शेतकरी ऐनवेळी पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे.