शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कमलापूर तालुका निर्माण करा

By admin | Updated: December 30, 2016 01:52 IST

अहेरी तालुका मुख्यालयापासून ४६ किमी अंतरावर अतिदुर्गम भागात असलेल्या कमलापूरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा,

गावकऱ्यांची बैठक : १०० किमीचे अंतर ग्रामीण जनतेला तुडवावे लागते कमलापूर : अहेरी तालुका मुख्यालयापासून ४६ किमी अंतरावर अतिदुर्गम भागात असलेल्या कमलापूरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी कमलापूर तालुका संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, राज्यपाल व जिल्हाधिकाऱ्यांकडे उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कमलापूर तालुका संघर्ष समितीने नवीन तालुका निर्मितीबाबत शासनाकडे वारंवार निवेदने सादर केली आहेत. तत्कालीन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी २००१ साली व तत्कालीन खासदार नरेश पुगलिया यांनी ३१ जानेवारी २००२ ला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मात्र यावर कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. कमलापूर हे गाव अहेरी तालुका मुख्यालयापासून ४६ किमी अंतरावर आहे. भौगोलिकदृष्ट्या अहेरी तालुका खूप विस्तारलेला आहे. अहेरी तालुका मुख्यालयापासून दुर्गम भागातील ग्रामपंचायती १०० किमी अंतरावर आहेत. या भागामध्ये कोणतेही उद्योगधंदे नाहीत. यामुळे येथील नागरिकांची उपजिविका केवळ शेतीच्या भरवशावर चालते. सिंचनाच्या सोयींचा अभाव असल्याने शेतीही निसर्गावरच अवलंबून आहे. अनेक वर्षांपासून पावसाचा लहरीपणा सुरू असून शेतकरी नापिकीमुळे हवालदील झाला आहे. लोकांमध्ये अशिक्षितपणा दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय व निमशासकीय कामे करून घेण्यासाठी तालुका मुख्यालयी दोन - दोन दिवस मुक्कामी रहावे लागते. तरीही कामे होत नाहीत. उलट आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. अनेक शासकीय योजनांपासून नागरिकांना वंचित रहावे लागत आहे. गावे तालुका मुख्यालयापासून दूर अंतरावर असल्याने या गावांमध्ये कोणत्याही विभागाचे अधिकारी भेट देत नाहीत. यामुळे योजनांचा पुरेपूर फायदा होत नाही. कमलापूर परिसरातील २० ग्रामपंचायतीमधील नागरिकांना कमलापूर हे गाव सोयीचे आहे. परिसरातील ५ किमीच्या आतील खेड्यातील लोकसंख्या १५ हजारांच्या जवळपास असून कमलापूर व्यतिरिक्त इतर गावांची संख्या कमी आहे. यामुळे कमलापूर येथे तालुका निर्मिती केल्यास नागरिकांना शासनापर्यंत लवकर पोहचता येईल. या बाबीची दखल घेऊन कमलापूरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.(वार्ताहर) जिमलगट्टा तालुका निर्मिती रखडली जिमलगट्टा : अहेरी व सिरोंचा या दोन्ही तालुकास्थळापासून जिमलगट्टा गावाचे अंतर सुमारे ६० किमी आहे व इतर गावांचे अंतर १०० पेक्षा अधिक किमी असल्याने जिमलगट्टाला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून मागील १५ वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. जिमलगट्टाचा परिसर आदिवासीबहुल अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या संवेदनशील आहे. जिमलगट्टा येथे मंडळ कार्यालय असून या कार्यालयाची वास्त निर्माणधीन आहे. या परिसरात एकूण ६५ गावांचा समावेश होतो. जिमलगट्टा परिसरात देचलीपेठा, उमानूर, मरपेली, दामरंचा या अतिदुर्गम भागातील जनतेला तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी फार मोठी अडचण होते. या भागात वाहतुकीची साधने अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे या गावांमधून अहेरी या तालुकास्थळी जाऊन पुन्हा त्याच दिवशी परत येणे शक्य होत नाही. त्यामुळे या परिसरातील बहुतांश नागरिक दाखलेच काढत नसल्याची गंभीर स्थिती आहे. परिणामी अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. येथील तालुका संघर्ष समितीने तालुका निर्मितीसाठी अनेकदा चक्काजाम आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा जिमलगट्टा येथे उपलब्ध आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, मंडळ कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, वन विभागाचे कार्यालय, वन विकास महामंडळ, शाळा, महाविद्यालयेसुद्धा आहेत. जिमलगट्टा तालुका म्हणून घोषित केल्यास. परिसरातील जवळपास ३० ते ४० हजार जनतेला प्रशासकीय लाभ मिळण्यास मदत होईल. (वार्ताहर)