शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कापूस निघण्यास सुरुवात, खरेदी केंद्राचा पत्ता नाही

By admin | Updated: October 19, 2016 02:20 IST

गडचिरोली जिल्ह्यात खासगी कापूस व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी येत नाहीत.

जिल्ह्यातील कापूस उत्पादकांची व्यथा : सिरोंचा, मुलचेरा, अहेरी, चामोर्शी तालुक्यात उत्पादनगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात खासगी कापूस व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना परप्रांतात आपला कापूस विकावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र अहेरी, सिरोंचा भागात सुरू करावे, अशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. गडचिरोली जिल्ह्यात प्रमुख पीक धान असले तरी जिल्ह्याच्या अहेरी उपविभागासह चामोर्शी तालुक्यात अनेक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून कापसाचे पीक घेत आहे. यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर येण्याची आशा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आहे. गडचिरोली जिल्ह्यात ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांचा कापूस आता दसरा ते दिवाळीच्या दरम्यान निघण्यास सुरुवात होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच-सात वर्षांपासून कापसाचा पेरा सातत्याने वाढत आहे. सिरोंचा भागात उच्च प्रतीचा कापूस उत्पादीत केला जातो. जिल्ह्यात उत्पादन होणारा कापूस गडचिरोली जिल्ह्यात खरेदीदार नसल्यामुळे शेतकऱ्यांना बाहेर ठिकाणी नेऊन विकावा लागतो. अनेक शेतकरी हिंगणघाट, आदिलाबाद वा तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यात नेऊन विकतात. गडचिरोली जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जिल्ह्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र केंद्र सरकारने सुरू करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. धर्मरावबाबा आत्राम पालकमंत्री असताना २००८ मध्ये सिरोंचा येथे कापूस पणन महासंघाचे अस्थायी कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. तर मध्यंतरीच्या काळात पांढुर्णा येथून व्यापाऱ्यांना बोलावून अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीने कापूस खरेदी केंद्र सुरू केले होते. या केंद्रांवर शेतकऱ्यांच्या मालाची मोठी आवकही त्यावेळी झाली होती. परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे कापूस खरेदी केंद्र बंद करण्यात आले. यावर्षी कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. पाकिस्तानसह इतर देशात कापूस उत्पादनात घट आली आहे व सुताचे भाव मोठ्या प्रमाणावर पडल्याने खासगी सुतगिरण्यांची कापूस खरेदी राज्यात सर्वत्र बंद राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील कापूस उत्पादकांची मोठी अडचण निर्माण होणार आहे. खासगी व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी शेतकऱ्यांकडून करू शकतात, अशी शक्यता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुरूंगवासाची भीती व्यापाऱ्यांना दाखविली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी कुठुनच व्यापारी येत नाही. त्यामुळे या भागात केंद्र सरकारने कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) चे कापूस खरेदी केंद्र अहेरी, सिरोंचा भागात सुरू करावे, अशी मागणी या भागातील कापूस उत्पादकांनी केली आहे. खा. अशोक नेते यांनी या प्रश्नावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंतीही कापूस उत्पादकांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र स्थायी स्वरूपात सुरू झाल्यास पुढील वर्षांपासून कापूस पेरा वाढण्याची शक्यता निर्माण होईल.