शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

पर्लकोटावरील जुन्या पुलाचे बंधाऱ्यात रूपांतर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 5:00 AM

यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पर्लकोटा नदीचे पात्र कोरडे झाल्याने भामरागडवासीयांची चिंता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पर्लकोटा नदीला संजीवनी मिळाली. अचानक पात्रातील पाणी वाढले. नवीन पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रात तयार केलेल्या तात्पुरत्या रस्त्यामुळे नदीतील वाहून जाणारे पाणी थांबून बंधाऱ्यासारखे स्वरूप आले आहे. त्यातूनच अनेकांनी जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात करण्याची कल्पना सुचवली आहे.

ठळक मुद्देभामरागडवासीयांकडून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ उपक्रम राबवण्याची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कभामरागड : पर्लकोटा नदीवर नवीन उंच पुलाचे बांधकाम केले जात आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात करून वाहून जाणारे पाणी अडविल्यास उन्हाळ्यात भामरागडमधील भूजल पातळी कमी होणार नाही, असे  मत नगरवासीयांकडून व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील भामरागडच्या घनदाट जंगलात दरवर्षी भरपूर पाऊस पडतो; पण अलीकडे झपाट्याने जंगल नष्ट होत आहे. त्यामुळे तापमानात दिवसागणित वाढ होण्यासोबतच भूजल पातळीही खालावत आहे. पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रवती या तीनही नद्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात. मात्र, पावसाळा संपताच कोरड्या पडतात. यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पर्लकोटा नदीचे पात्र कोरडे झाल्याने भामरागडवासीयांची चिंता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पर्लकोटा नदीला संजीवनी मिळाली. अचानक पात्रातील पाणी वाढले. नवीन पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रात तयार केलेल्या तात्पुरत्या रस्त्यामुळे नदीतील वाहून जाणारे पाणी थांबून बंधाऱ्यासारखे स्वरूप आले आहे. त्यातूनच अनेकांनी जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात करण्याची कल्पना सुचवली आहे.भूजल पुनर्भरणाची गरज लक्षात घेऊन  ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ ही राज्य सरकारची जुनीच संकल्पना गांभीर्याने राबविणे काळाची गरज झालेली आहे. शेजारील चंद्रपूर जिल्ह्यात जानाळा-पोंबुर्णा मार्गावरील अंधारी नदीवर याच पद्धतीने जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात केले आहे. 

पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडून वाढल्या अपेक्षागेल्या २० वर्षांपासून पर्लकोटा नदीवरील पुलाचे बांधकाम करण्याची मागणी होत आहे. हे बांधकाम सुरू झाल्यानंतर वनविभागाच्या आडकाठीने पुन्हा थांबले होते. कंत्राटदारसुद्धा पळ काढण्याच्या तयारी होते; परंतु पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी विशेष लक्ष देऊन मंत्रालयात केलेल्या पाठपुराव्याने या कामातील अडथळे दूर होऊन हे काम पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे त्यांच्याकडून भामरागडवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात करण्यासाठीही ते सकारात्मक दृष्टिकोन ठेवून भामरागडवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

 

टॅग्स :riverनदीWaterपाणी