शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

झाडावरच दाणापाण्याची केली सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:12 AM

उन्हाळ्यात पक्ष्यांना भेडसावणारी चारा व पाण्याची समस्या लक्षात घेऊन अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीतर्फे झाडावरच मातीचे पात्र टांगून पक्ष्यांच्या पाणी व चाऱ्याची सोय केली आहे.

ठळक मुद्देपक्ष्यांचा किलबिलाट वाढला : अहेरी-महागाव मार्गावर ५० झाडांना बांधले मातीचे शेकडो पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : उन्हाळ्यात पक्ष्यांना भेडसावणारी चारा व पाण्याची समस्या लक्षात घेऊन अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीतर्फे झाडावरच मातीचे पात्र टांगून पक्ष्यांच्या पाणी व चाऱ्याची सोय केली आहे.अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ तलांडे यांच्या नेतृत्वात ही समिती अहेरी जिल्हा निर्मितीसाठी मागील सात वर्षांपासून सातत्याने संघर्ष करीत आहे. विविध सामाजिक उपक्रम राबविण्यातही ही संस्था पुढाकार घेत असल्याने अहेरी विभागात या समितीची विशेष ओळख आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे. जंगल तसेच शेतशिवारातील नदी, नाले, तलाव निर्जल झाले आहेत. उष्णतेचा पारा ४४ अंशापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पाण्याची पूर्वीपेक्षा अधिक गरज असताना जलसाठे आटले आहेत. त्यामुळे पशुपक्ष्यांना गावाकडे धाव घेतल्याशिवाय पर्याय शिल्लक राहला नाही. जंगलात एखादा पाणवटा असल्यास त्या ठिकाणी पशुपक्षी गोळा होत असल्याने शिकारी टपूनच राहतात. अशा परिस्थितीत पक्ष्यांच्या चारा व पाण्याची सोय झाडावरच होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन समितीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ तलांडे यांच्या मार्गदर्शनात अहेरी-महागाव मार्गावरील झाडांवर पाणी व चाºयासाठी पात्र बांधले आहेत.एक किमी अंतरावरील पक्ष्यांसाठी सोयअहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या पुढाकारातून अहेरी-महागाव मार्गावरील जवळपास ५० वृक्षांना मातीचे पात्र बांधण्यात आले आहे. प्रत्येक वृक्षाला जवळपास पाच ते सहा पात्र बांधले आहेत. काही पात्रांमध्ये पाणी तर काही पात्रांमध्ये चारा टाकला जातो. महागाव मार्गावर पहाटेच्या सुमारास फिरायला जाणारे नागरिकही पात्रांमध्ये पाणी व चारा टाकत आहेत. त्यामुळे पक्षी बचाव ही चळवळ निर्माण होण्यास मदत झाली आहे. झाडावरच पाणी व चाºयाची सोय होत असल्याने झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट दिसून येत आहे. अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. इतरही सामाजिक संस्थांनी असे उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.