शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज नगर परिषदेच्या स्थापनेला ५५ वर्षे पूर्ण

By admin | Updated: May 1, 2016 01:16 IST

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती करण्यात आली. राज्य निर्मितीनंतर एकाच वर्षाने ...

कमी लोकसंख्येची नगर परिषद म्हणून परिचित : १ मे १९६१ मध्ये देसाईगंज ग्रा. पं. चे रूपांतरदेसाईगंज : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती करण्यात आली. राज्य निर्मितीनंतर एकाच वर्षाने स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांच्या मागणीला होकार देत तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १ मे १९६१ ला वडसा ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर केले. तत्कालीन परिस्थितीनुसार केवळ ५ ते ७ हजार लोकसंख्या असलेली नवीन नगर परिषद चंद्रपूर जिल्ह्यात नावारूपास आली. सर्वात कमी लोकसंख्येची नगरपरिषद म्हणून देसाईगंजची तेव्हा ओळख निर्माण झाली होती़ रविवार १ मे २०१६ ला देसाईगंज नगर परिषदेचा ५५ वा वर्धापन दिन आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेपूर्वी सी. पी. अ‍ॅन्ड बेरार काळात जुन्या मध्यप्रदेश राज्याचा एक भाग होता. मध्यप्रदेश राज्याचे आयुक्तालय चंद्रपूरस्थित होते. चंद्रपूरचे तत्कालीन सहआयुक्त सी. सी. देसाई यांनी १९३३ मध्ये देसाईगंज शहराची स्थापना केली. केवळ ५ ते ७ हजार लोकसंख्येच्या वडसा व नैनपूर ग्रामपंचायतीच्या विलिनीकरणातून १ मे १९६१ साली देसाईगंज नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली़ वडसा रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर हरबाजी हटवार यांचे सी. सी. देसाई यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते़ एकदा देसाई शहरात भेटीदरम्यान आल्यावर शहराला मध्यवर्ती स्थान व रेल्वेस्थानक तसेच धानाची मोठी आवक असल्यामुळे भविष्यात येथे मोठी बाजारपेठ तयार होऊ शकते, यासाठी स्थानिकांनी प्रयत्न करण्याचा सल्ला देसाई यांनी दिला होता. त्याला अनुसरूनच हरबाजी हटवार, बिडी ठेकेदार हाजी अब्दुल रफी यांनी प्रयत्न चालविले़ १९३३ साली हाजी अब्दुल रफी यांच्या अध्यक्षतेखाली सहआयुक्त सी. सी. देसाई यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून सहआयुक्त सी. सी. देसाई यांच्या नावाने देसाईगंज शहराची कोनशिला ठेवली़ यावेळी हरबाजी हटवार हे सचिव म्हणून मंचकावर हजर होते़ वडसा रेल्वेस्थानकाला देसाईगंज म्हणून नवीन नाव मिळाले़ देसाईगंज हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथून सगळीकडेच व्यापाराची जडणघडण होऊ लागली़ ग्यानचंद शर्मा, अ‍ॅड. ग. म. हटवार व अन्य नागरिकांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर लगेच एका वर्षाने १ मे १९६१ ला वडसा व नैनपूर ग्रामपंचायत विलिन करून देसाईगंज नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली़ चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीयस्तरावर ग्यानचंदजी शर्मा यांची तत्कालीन नगराध्यक्ष म्हणून नेमणूक केली़ १ मे १९६१ ते १८ डिसेंबर १९६२ पर्यंत ते नगराध्यक्ष होते़ शासकीय नियुक्ती असल्यामुळे त्यांची नियुक्ती खारिज करून १९६२ साली नगर परिषदेची सार्वजनिक निवडणूक घेण्यात आली़ अ‍ॅड. ग. म. हटवार यांनी शहरातील १३ जागांपैकी १२ जागांवर आपला कब्जा केला़ सर्वसंमतीने अ‍ॅड. ग. म. हटवार हे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बनले़ हाती सत्ता आल्यावर केवळ १७०० रूपये हातात घेऊन नगरपरिषदेचा कारभार सुरू झाला़ तेव्हा शहराची लोकसंख्या केवळ ५ ते ७ हजार होती़ नगरपरिषदेचा वर्षाचा बजेट केवळ ५० हजार रूपयांचा राहत होता. सध्या देसाईगंज शहराची लोकसंख्या ४० हजारावर पोहोचली आहे़ एका वर्षाचा बजेट ५ कोटींवर घ्यावा लागत आहे. सन १९६४ मध्ये शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नळयोजना कार्यान्वित करण्यात आली. तेव्हा नगरपरिषदेकडे नळयोजनेसाठी भरावयास लागणारी रक्कम १९ हजार रूपये देखील नव्हते. निवडून आलेल्या सभासदांनी वर्गणी काढून ती रक्कम जमा केली. शासनाच्या विविध अनुदानातून शहरात विकासात्मक कामे होत गेली़ सन १९९१ ते १९९६ च्या काळात शहरात अग्नीशमन वाहन, रूग्णवाहिका आली़ तसेच शहरात विविध विकासकामे होत आहेत. शहरातील रस्ते, नाली यांचे बांधकाम करण्यात आले. शहरात दुतर्फा पथदिव्यांची सोय, क्रीडा संकूल सभागृह तयार करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात भरभराटीस आले असलेली नगरपरिषद म्हणून देसाईगंज पालिका नावारूपास आली आहे. (वार्ताहर)