शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

ऐन दिवाळीत एटापल्ली येथील पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 5:00 AM

१० हजार लोकसंख्या असलेल्या एटापल्ली शहराला डुम्मी नाल्यावरून पाणीपुरवठा केला जातो. डुम्मी नाल्यावर विहीर खोदण्यात आली आहे. या विहिरीचे पाणी गावातील टाकीमध्ये टाकून पाणीपुरवठा केला जातो. दिवाळीच्या सणाची धामधूम सुरू असतानाच सहा दिवसांपूर्वी अचानक एटापल्लीचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ठळक मुद्देमोटारमध्ये बिघाड : सणाच्या कालावधीत पाण्यासाठी महिलांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : ऐन दिवाळीच्या कालावधीत एटापल्ली येथील पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. त्यामुळे एटापल्लीवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.१० हजार लोकसंख्या असलेल्या एटापल्ली शहराला डुम्मी नाल्यावरून पाणीपुरवठा केला जातो. डुम्मी नाल्यावर विहीर खोदण्यात आली आहे. या विहिरीचे पाणी गावातील टाकीमध्ये टाकून पाणीपुरवठा केला जातो. दिवाळीच्या सणाची धामधूम सुरू असतानाच सहा दिवसांपूर्वी अचानक एटापल्लीचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नळ योजना बंद असल्याबाबत नगर पंचायतीचे अभियंता नंदनवार यांना विचारणा केली असता, मोटार नादुरूस्त असल्याने पाणीपुरवठा बंद आहे. दोन दिवसात मोटार सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले.नळांद्वारे पाणीपुरवठा ज्या दिवशी होत नाही, त्या दिवशी महिला हातपंपाचे पाणी भरतात. मात्र एटापल्ली नगर पंचायतीने हातपंप दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले असल्याने अनेक हातपंप बंद आहेत, असा आरोप मनोज वरगंटीवार यांच्यासह नागरिकांकडून होत आहे. आठ वर्षांपूर्वी योजना बांधण्यात आली. त्यानंतर शहराचा विस्तार दरवर्षी होत आहे. नवीन वस्त्या वाढत आहेत. मात्र या नवीन वस्त्यांमध्ये पाईपलाईन टाकण्यात आली नाही.एटापल्ली नगर पंचायतीअंतर्गत एटापल्ली टोला, कृष्णार, जीवनगट्टा, मरपल्ली, वासामुंडी या गावांचा समावेश होतो. मात्र या गावांना नळ योजनेची सुविधा उपलब्ध नाही. केवळ एटापल्ली शहरालाच नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. विशेष म्हणजे एटापल्ली येथे ग्रामपंचायत असताना पाणीपुरवठा योजना बांधण्यात आली. नगर पंचायतीची निर्मिती होेऊन आता पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी होत चालला आहे. मात्र या योजनेत कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही. डुम्मी नाल्यावरच दोन विहिरी खोदल्या आहेत. मात्र मोटार बसविणे, विद्युत पुरवठा आदी कामे करण्यात आली नाही. ज्या विहिरीतून सध्या पाणीपुरवठा सुरू आहे ती विहीर आकाराने लहान आहे. पाणी पुरत नसल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.बांडे नदी भागवू शकते अनेक गावांची तहानबांडे ही एटापल्ली तालुक्यातील सर्वात मोठी नदी आहे. ही नदी अनेक गावांना वळसा घालून पुढे जाते. विशेष म्हणजे जंगलातून वाहत असल्याने या नदीला बारमाही पाणी राहते. एटापल्लीपासून ही नदी जेमतेम पाच किमी अंतरावर आहे. या नदीवर पाणीपुरवठा योजना तयार केल्यास एटापल्लीसह तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गावांची तहान भागू शकते. सर्वांसाठी एक संयुक्त पाणीपुरवठा योजना बांधल्यास ती यशस्वी होऊ शकते.

टॅग्स :water shortageपाणीकपात