शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
3
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
4
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
5
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
6
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
7
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
8
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
9
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
10
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
11
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
12
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
13
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
14
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
15
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
16
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
17
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
18
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
19
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
20
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी पुलाचे काम रखडले

By admin | Updated: May 24, 2015 02:06 IST

कमी उंचीच्या पुलामुळे अहेरी उपविभागातील जनजीवन पावसाळ्यात विस्कळीत होते.

अहेरी : कमी उंचीच्या पुलामुळे अहेरी उपविभागातील जनजीवन पावसाळ्यात विस्कळीत होते. त्यामुळे या पुलाची उंची वाढवून नव्याने पूल उभारण्यात यावा, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत आहे. मात्र राज्य शासनाने निधी न दिल्यामुळे कमी उंचीच्या पुलाचे बांधकाम रखडले असल्याची माहिती आहे. परिणामी आगामी पावसाळ्यात पुन्हा मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
अहेरी उपविभागात पर्लकोटा, प्राणहिता नदीवर कमी उंचीचे पूल असल्याने पावसाळ्यात वाहतूक ठप्प होते. गडअहेरी तसेच बांडीया नदीवरही कमी उंचीचे पूल असल्याने जनजीवन विस्कळीत होते. पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची वाढविण्यात न आल्याने भामरागड भागातील नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. प्राणहिता नदीवर दोन राज्यांना जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम करण्याची सातत्याने मागणी होत आहे. मात्र याकडेही राज्य शासनाचे दुर्लक्ष आहे. कमी उंचीच्या पुलामुळे या भागातील १०० हून अधिक गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. बांडीया नदीवरील पुलाची उंची वाढविण्यात न आल्याने जारावंडी भागातील नागरिकांना जिल्हा निर्मितीच्या ३३ वर्षांनंतरही समस्यांचा सामना करावा लागत आहे.
अहेरीचे तत्कालीन आमदार दीपक आत्राम व तत्कालीन आंध्रप्रदेशचे आमदार कोनप्पा यांनी प्राणहिता नदीवरील पुलाच्या बांधकामाचे वांगेपल्ली येथे भूमीपूजन केले होते. दरम्यानच्या काळात पुलाच्या बांधकामासाठी कोट्यवधी रूपये मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र राज्य सरकारने प्रत्यक्षात निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे मागील पाच वर्षभरात या पुलाचे काहीही काम झाले नाही. त्यामुळे पूल निर्मितीचा प्रश्न कायमच आहे. कमी उंचीच्या पुलाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांनी निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी)
पालमंत्र्यांकडूनही भ्रमनिरास
आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व तेलंगणाचे आमदार कोनप्पा यांनी संयुक्तरित्या काही दिवसापूर्वी प्राणहिता नदीवरील पुलाच्या बांधकामाच्या प्रस्तावित स्थळाला भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी या भागातील जनतेमध्ये आशेचा किरण निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर पालकमंत्री आत्राम यांच्याकडून या पुलाच्या बांधकाम होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे जनतेचा पुन्हा भ्रमनिरास झाला. बांधकामाअभावी यंदाच्या पावसाळ्यात या भागातील नागरिकांना समस्येचा सामना करावा लागणार आहे.