शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भेटीगाठीसाेबतच मदतही आटली; आजी आजाेबा पडले एकाकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST

गडचिराेली : काैंटुंबिक, किरकाेळ भांडण व इतर विविध कारणांमुळे वृद्ध आजी-आजाेबा तसेच नागरिकांना पर्याय नाही म्हणून वृद्धाश्रमात राहावे लागत ...

गडचिराेली : काैंटुंबिक, किरकाेळ भांडण व इतर विविध कारणांमुळे वृद्ध आजी-आजाेबा तसेच नागरिकांना पर्याय नाही म्हणून वृद्धाश्रमात राहावे लागत आहे. गडचिराेलीच्या माताेश्री वृद्धाश्रमातील वृद्ध निराधार आहेत. मात्र काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे येथे येऊन भेट देणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात मिळणारी मदत बंद झाली असून, या वृद्धाश्रमातील ६ वृद्ध नागरिक एकाकी पडले आहेत.

येथील माताेश्री वृद्धाश्रमात चंद्रपूर व गडचिराेली या दाेन्ही जिल्ह्यांतील वृद्धांना प्रवेश दिला जाताे. या वृद्धाश्रमातील वृद्धांच्या पालनपाेषणासाठी संस्थेसह देणगीदारांचे सहकार्य लाभत असते. जवळपास २० देणगीदार मासिक वर्गणी देणारे असून या वर्गणीतून किराणा, भाजीपाला गॅस व इतर खर्च भागविला जाताे.

बाॅक्स ....

भेट देणारे शून्यावर

गडचिराेली शहरात विवेकानंदनगर परिसरात एकमेव माताेश्री वृद्धाश्रम आहे. या वृद्धाश्रमात अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच इतर बरेच मान्यवर काेणत्या न काेणत्या निमित्ताने जाऊन वृद्धांची भेट घेत असतात.

महापुरुषांच्या जयंती किंवा स्वत:चे वाढदिवस राहिले की अनेक लाेक या वृद्धाश्रमात जाऊन या वृद्धांना कपडे, फळे, बिस्किटे व इतर वस्तू भेट देतात. आता काेराेना संसर्गाच्या भीतीने व संचारबंदीमुळे येथे भेट देणाऱ्यांची संख्या शून्यावरच पाेहाेचली असल्याचे दिसून येते.

बाॅक्स ...

भावना शून्यतेचा प्रत्यय

काेराेना महामारीमुळे आम्हाला येऊन भेटणाऱ्यांची संख्या घटली आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी वगळता बाहेरील एकही जणांनी येऊन आमच्याशी चर्चा केली नाही. काेराेना संसर्ग व संचारबंदीमुळे काेणीही येऊन आमच्याशी संवाद साधत नसल्याने एकाकीपणाचा व भावना शून्यतेचा अनुभव येत असल्याचे येथील वृद्ध आजी-आजाेबांनी सांगितले.

बाॅक्स ...

कार्यक्रम झाले बंद

काेराेना महामारीमुळे येथील छाेटे-माेठे कार्यक्रम बंद झाले आहेत. वाढदिवस निमित्ताने येथे अनेक कार्यक्रम हाेत असतात. मात्र या कार्यक्रमाला पूर्णत: ब्रेक लागला आहे. परिस्थितीमुळे आम्हाला एकाकीपणाचे जीवन जगावे लागत आहे. त्यात नेहमी मिळणारा भावनिक आधार काेराेनामुळे संपला आहे. काेराेनाचे संकट दूर व्हावे, अशी अपेक्षा वृद्धांनी व्यक्त केली.