शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

५२ टक्के वृक्ष जिवंत

By admin | Updated: October 25, 2014 22:38 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने सन २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ या तीन वर्षात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी हरितसेनेच्या शिक्षक

तपाासणीचा अंतिम अहवाल : वृक्ष संगोपनात देसाईगंज तालुका यशस्वीगडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीच्यावतीने सन २०११-१२, २०१२-१३ व २०१३-१४ या तीन वर्षात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी हरितसेनेच्या शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आली. तपासणीच्या अंतिम अहवालानुसार जिल्ह्यातील तीनही वर्षांतील जीवंत रोपांची टक्केवारी ५२.१२ इतकी आहे. देसाईगंज तालुक्याची तीनही वर्षाची जीवंत रोपट्यांची सरासरी टक्केवारी ७० पेक्षा अधिक असल्याने वृक्ष संगोपनात देसाईगंज तालुका यशस्वी झाला असल्याचे दिसून येते. राज्य शासनाच्या निर्णयानुसार दरवर्षी ग्रामपंचायतीमार्फत गावपरिसरात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड करण्यात येते. सदर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम दरवर्षी जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात राबविला जातो. यापूर्वी ग्रामपंचायतीच्या वृक्ष लागवडीची तपासणी प्रशासकीय यंत्रणेमार्फत करण्यात आली होती. मात्र प्रशासकीय यंत्रणेने तयार केलेल्या तपासणी अहवालात पूर्णत: तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे शासनाने निरपेक्ष विशेष वृक्ष लागवड तपासणी मोहीम हाती घेतली. शासनाच्या निर्णयानुसार हरित संरक्षक गटांमार्फत ग्रा.पं.च्या वृक्ष लागवडीच्या तपासणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. सदर वृक्ष लागवड तपासणी मोहीम हरित सेनेचे शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत २५ आॅगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या सुटीच्या दिवशी वृक्ष लागवडीची तपासणी करून अंतिम अहवाल जि. प. प्रशासनाकडे सादर केलेला आहे. सादर करण्यात आलेल्या या अंतिम अहवालानुसार सन २०११-१२ या वर्षातील जिवंत वृक्षांची टक्केवारी ५७.१९ आहे. यात धानोरा तालुक्याची टक्केवारी २४.८४, कुरखेडा ५७.६६, देसाईगंज ७६.१३, सिरोंचा ३४.५७ टक्के आहे. सन २०१२-१३ या वर्षात बाराही तालुक्यात ४ लाख ३७ हजार ५५३ वृक्षांची ग्रामपंचायतीमार्फत लागवड करण्यात आली होती. यापैकी नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अंतिम तपासणी अहवालानुसार जिवंत रोपट्यांची संख्या २ लाख ९० हजार ६१२ इतकी असून याची टक्केवारी ६६.४१ आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील जिवंत वृक्षांची टक्केवारी ४५.५६ टक्के आहे. आरमोरी ४८ टक्के, चामोर्शी २८.७४ टक्के, धानोरा ५२.६३ टक्के, एटापल्ली ४६.९१ टक्के, गडचिरोली ५९.२४ टक्के, कोरची ७९.६२ टक्के, कुरखेडा ५८ टक्के, मुलचेरा ४५.६० टक्के, देसाईगंज ६५.८१ टक्के व सिरोंचा तालुक्यातील जिवंत वृक्षांची टक्केवारी २६.१३ आहे.सन २०१३-१४ या वर्षात बाराही तालुक्यातील ग्रामपंचायतीमार्फत एकूण ६ लाख ६३ हजार ७३१ वृक्ष लागवड करण्यात आली. यापैकी नुकताच करण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत २ लाख ८२ हजार ६१८ जिवंत वृक्ष असल्याचे आढळून आले. या वर्षातील जीवंत वृक्षाची टक्केवारी ४२.५८ आहे. (स्थानिक प्रतिनिधी)