शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

बारावीची परीक्षा रद्द, पदवीचे प्रवेश कसे हाेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST

सर्वप्रथम केंद्रीय परीक्षा मंडळाने बारावीची परीक्षा रद्द केली. त्यानंतर राज्याच्या परीक्षा मंडळानेही परीक्षा रद्द केली आहे. बारावीच्या परीक्षेनंतर विविध ...

सर्वप्रथम केंद्रीय परीक्षा मंडळाने बारावीची परीक्षा रद्द केली. त्यानंतर राज्याच्या परीक्षा मंडळानेही परीक्षा रद्द केली आहे. बारावीच्या परीक्षेनंतर विविध शाखांमध्ये प्रवेश घेतला जातो. त्यामुळे बारावीच्या परीक्षेला अत्यंत महत्त्व आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी शाखांच्या प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घेतली जाते. मात्र बी. एस्सी., बी. काॅम., बी.ए., बी.एस.डब्ल्यू. आदी अभ्यासक्रमांना प्रवेश देताना बारावीचे गुणच लक्षात घेतले जातात. परीक्षा रद्द झाल्याने सर्वांनाच भरमसाठी गुण मिळण्याची शक्यता असल्याने हुशार विद्यार्थ्यांचे फार माेठे नुकसान हाेणार आहे. कशापद्धतीने गुणदान केले जाते, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.

बाॅक्स

बाारावीनंतरच्या संधी

- बारावीनंतर विद्यार्थी विविध शाखांमध्ये त्याच्या आवडीनुसार प्रवेश घेतात, त्यामुळे बारावीच्या परीक्षेला विशेष महत्त्व आहे.

- बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी शाखांना प्रवेश मिळतो.

- ग्रामीण भागातील विद्यार्थी बी.ए., बि.एस.डब्ल्यू., बी.काॅम., बी.एस्सी. आदी शाखांमध्ये प्रवेश घेऊन पदवीचे शिक्षण पूर्ण करतात.

काेट

इयत्ता १२ वीचा निकाल हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे निकाल तयार करताना अकरावीच्या गुणांसोबत विद्यार्थ्यांचे दहावीचे गुणसुद्धा विचारात घेणे गरजेचे आहे. ५० टक्के गुण दहावीचे घेण्यात यावेत व बाकी पन्नास टक्क्यांमध्ये अकरावी व शाळेच्या स्तरावरील गुण विचारात घेण्यात यावे. या पद्धतीने सर्वार्थाने निकाल तयार केल्यास त्यामध्ये हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

डॉ. पंकज चव्हाण, प्राचार्य, श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय, आष्टी

काेट

बारावीचे गुणदान करताना दहावीचे २५ गुण, अकरावीचे २५ गुण, ३० गुणांचे स्वाध्याय व २० गुणांची तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण विचारात घ्यावे. पदवीच्या प्रवेशाला बारावीच्या गुणांच्याआधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा इतर तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र सीईटी घेतली जाते. यात बारावीच्या गुणांचा विचार हाेत नाही. मला बारावीमधे कमी गुण मिळाले, असे एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल, तर शासनाने परिस्थिती सुरळीत झाल्यावर त्याची परीक्षा घ्यावी, जेणे करून त्याच्या मनात कोणताच संशय राहणार नाही.

दिलीप डांगे, प्राचार्य, विश्वशांती विद्यालय तथा ज्युनिअर काॅलेज, भेंडाळा

काेट

विद्यार्थी काय म्हणतात

काेराेनाचे संकट लक्षात घेता, बारावीची परीक्षा रद्द केली, हे जरी मान्य असले, तरी याेग्य पद्धतीने मूल्यांकन करून हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान हाेणार नाही, याची खबरदारी परीक्षा मंडळ व शिक्षकांनी घेण्याची गरज आहे.

सचिन बारापात्रे, विद्यार्थी

बारावीच्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळावे, यासाठी आपण वर्षभर अभ्यास केला. ऑनलाईन पद्धतीने शिकून अभ्यासक्रम समजून घेताना अनेक अडचणी येत हाेत्या. तरीही अभ्यास केला. परीक्षा देऊन जे गुण मिळाले असते त्या निकालाचा आनंद काही वेगळाच असता.

हेमंत मडावी, विद्यार्थी

बारावीतील एकूण विद्यार्थी

मुले - ६७९८

मुली - ६४३०