टीव्ही क्षेत्रातील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या संशयास्पद आत्महत्येनंतर अनेक वाहिन्यांनी हा विषय लावून धरल्यामुळे नाना पाटेकर यांनी त्यांना चांगलेच फटकारले.
एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर म्हणतात, ‘प्रत्युषाचा मृत्यु अत्यंत दुर्देवी आहे. पण मला असं दिसतय की, हा विषय माध्यमांनी सातत्याने लावून धरलाय. गावांमध्ये जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांचे काय? त्यांच्या आयुष्याचे मोल काहीच नाही का? असा प्रश्न नाना पाटेकर यांनी उपस्थित केला.
संवेदनशिल मन आणि आजूबाजूला घडणाºया विविध घडामोडींवर भूमिका घेण्याच्या स्वभावामुळे अभिनेते नाना पाटेकर कायमच चर्चेत असतात. गरज पडल्यास समोरच्याचा विचार न करता त्याला खडे बोल सुनाववण्याची ताकदही नाना पाटेकर यांच्याकडे आहे.
प्रत्युषाचा विषय थोडा बाजुला ठेवा- नाना पाटेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 23:26 IST