शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
2
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
3
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
4
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
7
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
8
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
10
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
11
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
12
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
13
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
14
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
15
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
16
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
17
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
18
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडीलांच्या भांडणांचा मुलांवर दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 22:30 IST

कोणत्या ना कोणत्या कारणावरून आई -वडील भांडत असतील तर मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो.  

मुलांच्या विकासासाठी घरात शांतता आणि संस्कारमय वातावरण असले पाहिजे. पण, जर कोणत्या ना कोणत्या कारणावरून आई -वडील भांडत असतील तर मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो.  

मुले जेव्हा आई-वडीलांना भांडतांना पाहतात तेव्हा ते त्यांना पाहूनच भांडण करायला शिकतात. मुलांना त्यांचे निरागस भावविश्व या आई वडीलांच्या भांडणांमुळे गमवावे लागते. यामध्ये आई-वडीलांनीही त्यांच्या मनाचा विचार करायला हवा.

त्यांच्यासमोर कधीही भांडण केले नाही पाहिजे. तुमच्यात काही वाद असतील तर चार भिंतींच्या आतच ती मिटवायला हवी. याचा दुरगामी परिणाम असाही आहे की, ते खुप कमी वयात स्वत:ला सावरतात आणि त्यांचे निरागस बालमन हरवून बसतात. त्यांच्या मानसिक तेवरही परिणाम होतो.

आई-वडीलांची भांडणे पाहून मुले नैराश्यात जाण्याची शक्यता असते. नेहमी त्यांना कशाची तरी भीती ही वाटतच असते. कधी आई-वडील भांडतील आणि आपल्याला मारतील असे काहीही विचार त्यांच्या मनात येतात. घरात जर नेहमी चिंतेचे, भांडणाचे वातावरण असेल तर लहान मुलेही मानसिकदृष्ट्या अस्थिर होऊ न जातात.

त्यांनाही आपण काय करावे हे कळत नाही. कधीकधी त्यांना असेही वाटते की, आपण आपल्या आईवडीलांना जड झालो आहोत म्हणून ते आपल्याला अशी वागणूक देतात. आई-वडीलांच्या भांडणाचे कारण ते स्व:लाच समजतात. कोणत्याच व्यक्तीवर त्यांचा विश्वास उरत नाही. प्रत्येक  व्यक्ती त्याला वाईट आणि भांडणाराच वाटू लागतो.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ते चिडचिडे होतात. त्यांना वाटते की, परिस्थिती आपल्या हातात नाही. ते परिस्थितीसमोर हतबल होतात आणि इप्सित साध्य प्राप्त न करू शकल्याने रागीट होतात.