शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

Ganesh Festival 2019 : हवेतील प्रदूषण टाळून गणेशोत्सव साजरा करायला हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 10:07 IST

मानवी हस्तक्षेपाने थोडेफार प्रदूषण होतेच ते दुरुस्त करण्याची प्रतिभा मुळातच निसर्गात असते; परंतु काही वेळा मर्यादेपलीकडे जाऊन प्रदूषण होते

बी. एन. शिंदे

अहमदनगर -  मानवी हस्तक्षेपाने थोडेफार प्रदूषण होतेच ते दुरुस्त करण्याची प्रतिभा मुळातच निसर्गात असते; परंतु काही वेळा मर्यादेपलीकडे जाऊन प्रदूषण होते. ते आक्राळ-विक्राळ रूप धारण करते. मानवासह जिवाणूंनाही ते घातक ठरते. 

गणेशोत्सव आपल्याकडे पारतंत्र्यात सुरू झाला. लोक यामुळे एकत्र आले. प्रबोधनाबरोबरच ब्रिटिशांविरुद्ध वातावरण निर्माण करण्याचा हेतूही सफल झाला; परंतु अलीकडे अफाट लोकसंख्या असलेल्या शहरी भागात उत्सव साजरे होतात. त्यातून ध्वनी, माती, पाणी, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रदूषणाबरोबर हवेचेही प्रदूषण प्रचंड वाढले. त्यामुळे नवनवीन समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. अलीकडे मंडळांची संख्या भरमसाट वाढून मंडपांचा अतिरेक होऊन मूलत: कार्बनडाय ऑक्साईड धूर व वाढलेल्या तापमानाची भर पडून हवा अधिक प्रदूषित होते. या उत्सवात मुंबई पुण्यातून अनेक लोक सुटी घेऊन खेड्यात येतात, तर खेड्यातील लोक पाहुणे म्हणून मोटारीने शहरात जातात. त्यामुळे इंधनाचे ज्वलन कित्येक पटीने वाढते. वाहतूक कोंडीमुळे हवा जास्तच प्रदूषित होऊन दम्यासारखे आजार बळावतात़ प्रचंड गर्दीच्या शहरात गणेशोत्सवात लाखो लोक ये-जा करतात. या काळात इंधन ज्वलन वाढते शिवाय विद्युत रोषणाईसाठी विजेचा वारेमाप वापर होतो. त्यामुळे प्रदूषणाबरोबर तापमान वाढून हवामानात बदल होतो.

पर्यावरणपूरक उत्सव

विसर्जनावेळी निर्माल्य, केमिकल असलेल्या गणेशमूर्ती पाण्यात टाकल्यामुळे पाण्याबरोबर संयोग होऊन नवनवीन धातू वातावरणात मिसळतात़ सार्वजनिक गणपती उत्सवामुळे कलाविष्कार, उत्साह, सांस्कृतिक ऐक्य व काही प्रमाणात प्रबोधन जरूर होते; पण ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले. ते मागे पडून सर्व प्रकारचे प्रदूषण वाढते का, याचा विचारही व्हायला हवा. प्रदूषणाला फाटा देऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची आवश्यकता आहे.

आजार पसरतात

निर्माल्य, प्रसाद आदी वस्तू जवळपास टाकल्या जातात. हा उत्सव हवा शांत असताना पावसाळ्यात येतो. त्यामुळे निर्माल्यामुळे विविध वस्तू जागेवरच सडतात. परिणामी, दुर्गंधी पसरते. त्यामुळे परिसरात अनेक साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण होते.

गणरायाला निरोप देताना फटाके फोडण्याची गणेश मंडळांत स्पर्धा लागते. त्यातून धूर, धूळ, कचरा आणि कार्बनडाय ऑक्साईड, कार्बन मेनाक्साईड यासारखे विषारी वायू पसरून हवा अधिक प्रदूषित होते.

(लेखक हवामानतज्ज्ञ आहेत)

 

 

टॅग्स :environmentपर्यावरणGanesh Mahotsavगणेशोत्सवpollutionप्रदूषण