शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

कोटीतीर्थमध्ये आणखी एका कासवाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 10:50 AM

environment Muncipalty Kolhapur- कोटीतीर्थ तलावमध्ये गुरुवारी आणखी एका कासवाचा मृत्यू झाला. वनविभागाच्या पथकाने मृत कासव मंगळवार पेठ येथील पशुवैद्यकीय विभागाकडे विच्छेदनासाठी दिली असून, त्याचा अहवाल आल्यानंतर नेमका कशामुळे कासवांचा मृत्यू होतो हे स्पष्ट होणार आहे.

ठळक मुद्देकोटीतीर्थमध्ये आणखी एका कासवाचा मृत्यूमासेमारीचा गळ कारणीभूत

कोल्हापूर : कोटीतीर्थ तलावमध्ये गुरुवारी आणखी एका कासवाचा मृत्यू झाला. वनविभागाच्या पथकाने मृत कासव मंगळवार पेठ येथील पशुवैद्यकीय विभागाकडे विच्छेदनासाठी दिली असून, त्याचा अहवाल आल्यानंतर नेमका कशामुळे कासवांचा मृत्यू होतो हे स्पष्ट होणार आहे.गेल्या काही दिवसांपासून कोटीतीर्थ तलावातील कासव मृत होण्याच्या घटना घडत आहेत. मागील महिन्यांत पाच ते सहा कासव मृत झाले होते. आठ दिवसांपूर्वीही असाच प्रकार घडला हातो. दोन दिवसांपूर्वीही एक कासव मृत झाले.

गुरुवारी आणखी एका कासवाचा मृत्यू झाला. आतापर्यंत दहा कासवांचा मृत्यू झाल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. तलावातील पाण्याचा रंग हिरवट झाला आहे. यामध्ये मैला व गटाराचे पाणी मिसळत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या तलावातील जलचर प्राणी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.मासेमारीचा गळ कारणीभूतकोटीतीर्थमध्ये कासव मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये मासेमारीचा गळ कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, वारंवार घटना घडत असल्यामुळे दूषित पाणीही याला कारणीभूत असण्याची दाट शक्यता आहे. यासाठी पाण्याचे नमुने तपासावे लागतील, अशी प्रतिक्रिया वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.दूषित पाणी शुद्ध होण्यासाठी प्रयत्नकोटीतीर्थ तलावातील पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी तसेच दूषित पाणी शुद्ध होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तसेच तलावात कचरा, सांडपाणी जाऊ नये याचे नियोजन करावे लागेल. यासाठी आगामी बजेटमध्ये नावीण्य पूर्ण योजनेतून कोटीतीर्थ तलावासाठी निधी राखून ठेवणे आवश्यक असल्याची माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागातून दिली आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरणMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर