शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

वाऱ्या-पावसांत रस्त्याकडेची झाडं का कोसळतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:32 IST

पाऊस-वाऱ्याच्या एकाच तडाख्यात झाडं धारातीर्थी पडावीत इतकी त्यांची मुळं कमकुवत असतात का? आणि हे चित्र विशेषतः शहरांतच का बघायला मिळतं?

शेखर गायकवाड, संस्थापक अध्यक्ष, आपलं पर्यावरण, नाशिक

पावसाळा सुरू झाला किंवा अवकाळी पाऊस आल्यावर तसंच परतीच्या पावसात वादळवाऱ्यात अनेक शहरांत रस्त्याच्या कडेला बरीचशी झाडं उन्मळून पडलेली दिसतात. यंदाही अवकाळी पावसामुळे हेच चित्र अनेक शहरांमध्ये बघायला मिळतं आहे. झाडं पडल्यामुळे अनेक जण जखमी झाले, काहींना जीवही गमवावा लागला, वाहनांचं नुकसान होण्याच्या घटना तर अगणित आहेत.

मुख्य प्रश्न आहे, एक-दोन पावसांतच इतकी झाडं का कोसळतात? अगदी वादळी वारा आणि मुसळधार पाऊस असला तरी एकाच तडाख्यात झाडं धारातीर्थी पडावीत इतकी त्यांची मुळं कमकुवत असतात का? आणि हे चित्र विशेषतः केवळ शहरांतच का बघायला मिळतं? माळरानावर, उघड्यावर असलेली झाडं अपवाद वगळता का कोसळत नाहीत? तसं बघायला गेलं तर मोकळ्या जागेतली झाडं जास्त पडायला हवीत, कारण त्यांना कोणताच आडोसा नसतो, पण शहरांमध्ये जी झाडं कोसळताना दिसतात, त्यांच्या अवतीभोवती मोठ्या इमारती आहेत, इतर विविध प्रकारचे आडोसे आहेत. त्यामुळे वादळवाऱ्यापासून त्यांचा बऱ्यापैकी बचाव होतो. समजा मोकळ्या जागेत ३० किलोमीटर प्रतितास वारा वाहत असेल, तर शहरांमध्ये त्याच वाऱ्याचा वेग बऱ्यापैकी मंदावलेला असतो. तरीही ही झाडं पडतात.

शेतांमध्ये, वनांमध्ये किंवा मोकळ्या जागेत फारच अपवादात्मक स्थितीत; जिथे मातीचा स्तर खोल असतो, अशा ठिकाणी जास्त पावसामुळे माती खूप ओली होते. त्यामुळे मुळांची मातीतील पक्कड सैल होऊन वादळी वाऱ्यांत आपला भार सांभाळण्यास अक्षम झाल्याने, काही झाडं उन्मळून पडतात. मोकळ्या जागेतील झाडं दिमाखात उभी असतात, कारण त्यांच्या मुळांच्या विस्ताराला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नसते, त्याचप्रमाणे त्यांच्या पर्णसंभाराला मानवी हस्तक्षेप होऊन कुठल्या प्रकारची असंतुलित तोड झालेली नसते. त्यामुळे वादळवाऱ्यातही आपला भार सांभाळण्यास ही झाडं सक्षम असतात.

मग शहरांतली, रस्त्याच्या कडेला असलेली, तुलनेनं 'सुरक्षित' असलेली झाडं का उन्मळून पडतात? बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या दोन्ही बाजूने विविध प्रकारच्या खोदकामामुळे, उदाहरणार्थ, पाइपलाइन, पावसाळी गटार योजना, गॅसलाइन.. इत्यादी कारणांमुळे झाडांच्या मुळांच्या विस्ताराची तोड केलेली असते, मुळांचे बऱ्यापैकी नुकसान झालेले असते. झाडांच्या पर्णसंभाराचीही कुठल्या ना कुठल्या कारणाने असंतुलित छाटणी केली जाते. त्यामुळे बऱ्याच वेळा या झाडांच्या पर्णसंभाराचा भार एकाच बाजूला वाढलेला असतो.

अनेक ठिकाणी न्यायालयाचे आदेश डावलून झाडांच्या खोडाभोवती गच्च काँक्रिटीकरणाचा थर दिलेला असतो, ज्यामुळे ते आवळले जाऊन खोडाची साल खराब होते किंवा खोडाशी पाणी मुरून झाडं कुजतात. अशा कारणांमुळे आपला भार सांभाळण्यास अक्षम झालेली झाडं उन्मळून पडतात. त्यात प्रामुख्याने गुलमोहर, रेन ट्री, सुबाभूळ, स्पेतोडीया (पिचकारी वृक्ष), पेल्ट्राफॉर्म.. अशी परदेशी प्रजातीची, भरभर वाढणारी, अवाढव्य विस्तार असलेली झाडं असतात. उन्मळणाऱ्या झाडांमध्ये या झाडांचं प्रमाण जवळपास ९५ टक्के आहे. कारण याच प्रजाती मुख्यत्वे रस्त्याच्या कडेने लावल्या गेल्या आहेत.

कोणती झाडं, कुठे लावली गेली पाहिजेत, त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे, याचं शास्त्र समूजन घेणंही अत्यावश्यक आहे. येणाऱ्या काळात अभ्यासपूर्ण रीतीनं योग्य ठिकाणी योग्य वृक्ष प्रजार्तीची लागवड ही काळाची गरज आहे. तसं झालं तर एकाच पावसात झार्ड उन्मळून पडण्याचे, हाहाकार उडण्याचे प्रकार नक्कीच कमी होतील. शहरांमध्ये झाडं पडण्याच्या घटना थांबवायच्या असतील तर झाडांच्या वाढीतला मानवी हस्तक्षेप थांबवणंही तितकंच गरजेचं आहे.shekargaikwadtnc@gmail.com 

टॅग्स :Rainपाऊसenvironmentपर्यावरण