शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
4
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
5
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
6
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
7
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
8
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
9
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
10
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
11
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
12
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
13
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
14
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
15
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
16
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
17
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
18
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
19
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
20
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर

वाऱ्या-पावसांत रस्त्याकडेची झाडं का कोसळतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 08:32 IST

पाऊस-वाऱ्याच्या एकाच तडाख्यात झाडं धारातीर्थी पडावीत इतकी त्यांची मुळं कमकुवत असतात का? आणि हे चित्र विशेषतः शहरांतच का बघायला मिळतं?

शेखर गायकवाड, संस्थापक अध्यक्ष, आपलं पर्यावरण, नाशिक

पावसाळा सुरू झाला किंवा अवकाळी पाऊस आल्यावर तसंच परतीच्या पावसात वादळवाऱ्यात अनेक शहरांत रस्त्याच्या कडेला बरीचशी झाडं उन्मळून पडलेली दिसतात. यंदाही अवकाळी पावसामुळे हेच चित्र अनेक शहरांमध्ये बघायला मिळतं आहे. झाडं पडल्यामुळे अनेक जण जखमी झाले, काहींना जीवही गमवावा लागला, वाहनांचं नुकसान होण्याच्या घटना तर अगणित आहेत.

मुख्य प्रश्न आहे, एक-दोन पावसांतच इतकी झाडं का कोसळतात? अगदी वादळी वारा आणि मुसळधार पाऊस असला तरी एकाच तडाख्यात झाडं धारातीर्थी पडावीत इतकी त्यांची मुळं कमकुवत असतात का? आणि हे चित्र विशेषतः केवळ शहरांतच का बघायला मिळतं? माळरानावर, उघड्यावर असलेली झाडं अपवाद वगळता का कोसळत नाहीत? तसं बघायला गेलं तर मोकळ्या जागेतली झाडं जास्त पडायला हवीत, कारण त्यांना कोणताच आडोसा नसतो, पण शहरांमध्ये जी झाडं कोसळताना दिसतात, त्यांच्या अवतीभोवती मोठ्या इमारती आहेत, इतर विविध प्रकारचे आडोसे आहेत. त्यामुळे वादळवाऱ्यापासून त्यांचा बऱ्यापैकी बचाव होतो. समजा मोकळ्या जागेत ३० किलोमीटर प्रतितास वारा वाहत असेल, तर शहरांमध्ये त्याच वाऱ्याचा वेग बऱ्यापैकी मंदावलेला असतो. तरीही ही झाडं पडतात.

शेतांमध्ये, वनांमध्ये किंवा मोकळ्या जागेत फारच अपवादात्मक स्थितीत; जिथे मातीचा स्तर खोल असतो, अशा ठिकाणी जास्त पावसामुळे माती खूप ओली होते. त्यामुळे मुळांची मातीतील पक्कड सैल होऊन वादळी वाऱ्यांत आपला भार सांभाळण्यास अक्षम झाल्याने, काही झाडं उन्मळून पडतात. मोकळ्या जागेतील झाडं दिमाखात उभी असतात, कारण त्यांच्या मुळांच्या विस्ताराला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नसते, त्याचप्रमाणे त्यांच्या पर्णसंभाराला मानवी हस्तक्षेप होऊन कुठल्या प्रकारची असंतुलित तोड झालेली नसते. त्यामुळे वादळवाऱ्यातही आपला भार सांभाळण्यास ही झाडं सक्षम असतात.

मग शहरांतली, रस्त्याच्या कडेला असलेली, तुलनेनं 'सुरक्षित' असलेली झाडं का उन्मळून पडतात? बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या दोन्ही बाजूने विविध प्रकारच्या खोदकामामुळे, उदाहरणार्थ, पाइपलाइन, पावसाळी गटार योजना, गॅसलाइन.. इत्यादी कारणांमुळे झाडांच्या मुळांच्या विस्ताराची तोड केलेली असते, मुळांचे बऱ्यापैकी नुकसान झालेले असते. झाडांच्या पर्णसंभाराचीही कुठल्या ना कुठल्या कारणाने असंतुलित छाटणी केली जाते. त्यामुळे बऱ्याच वेळा या झाडांच्या पर्णसंभाराचा भार एकाच बाजूला वाढलेला असतो.

अनेक ठिकाणी न्यायालयाचे आदेश डावलून झाडांच्या खोडाभोवती गच्च काँक्रिटीकरणाचा थर दिलेला असतो, ज्यामुळे ते आवळले जाऊन खोडाची साल खराब होते किंवा खोडाशी पाणी मुरून झाडं कुजतात. अशा कारणांमुळे आपला भार सांभाळण्यास अक्षम झालेली झाडं उन्मळून पडतात. त्यात प्रामुख्याने गुलमोहर, रेन ट्री, सुबाभूळ, स्पेतोडीया (पिचकारी वृक्ष), पेल्ट्राफॉर्म.. अशी परदेशी प्रजातीची, भरभर वाढणारी, अवाढव्य विस्तार असलेली झाडं असतात. उन्मळणाऱ्या झाडांमध्ये या झाडांचं प्रमाण जवळपास ९५ टक्के आहे. कारण याच प्रजाती मुख्यत्वे रस्त्याच्या कडेने लावल्या गेल्या आहेत.

कोणती झाडं, कुठे लावली गेली पाहिजेत, त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे, याचं शास्त्र समूजन घेणंही अत्यावश्यक आहे. येणाऱ्या काळात अभ्यासपूर्ण रीतीनं योग्य ठिकाणी योग्य वृक्ष प्रजार्तीची लागवड ही काळाची गरज आहे. तसं झालं तर एकाच पावसात झार्ड उन्मळून पडण्याचे, हाहाकार उडण्याचे प्रकार नक्कीच कमी होतील. शहरांमध्ये झाडं पडण्याच्या घटना थांबवायच्या असतील तर झाडांच्या वाढीतला मानवी हस्तक्षेप थांबवणंही तितकंच गरजेचं आहे.shekargaikwadtnc@gmail.com 

टॅग्स :Rainपाऊसenvironmentपर्यावरण