शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
3
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
4
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
10
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
11
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
12
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
13
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
14
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
15
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
16
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
17
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
18
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
19
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
20
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
Daily Top 2Weekly Top 5

पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 07:34 IST

अमेरिका स्वतःपुरता विचार करत असल्याने तिचे स्वतःचेच नुकसान अधिक होतेय, हे ट्रम्पना कधी कळेल ते समजत नाही

जागतिकीकरणानंतर जग खुले होईल, ‘ग्लोबल व्हिलेज’ प्रत्यक्षात आकाराला येईल, अशी अपेक्षा होती. बराक ओबामांनी अमेरिकेचे अध्यक्षपद मिळवले तेव्हा ‘द पोस्ट-अमेरिकन वर्ल्ड’सारख्या ग्रंथांमधून फरीद झकारिया तीच तर मांडणी तेव्हा करत होते. सेतू उभे राहतील; भिंती पडतील, अशी स्वाभाविक अपेक्षा व्यक्त होत होती. १९८९मध्ये बर्लिनची भिंत कोसळल्यावर चर्चा सुरू होती ती या खुलेपणाची. नंतर तसे घडू लागलेही. मात्र, तो अवकाश हळूहळू बंदिस्ततेने व्यापून टाकला. मग मी, माझा, माझ्या देशापुरता असल्या घोषणा सुरू झाल्या आणि देशोदेशीचे डोनाल्ड ट्रम्प खुर्चीवर येऊन बसले. या ट्रम्प सरकारने अमेरिकेत आता सपाटा सुरू केला आहे तो परदेशी विद्यार्थ्यांना बाहेर हाकलून देण्याचा. मुळात अमेरिका आज जी काही ‘अमेरिका’ आहे, याचे एकमेव कारण ‘स्थलांतरित’.

‘स्थलांतर ज्ञानापेक्षा अधिक महत्त्वाचे’ असे आल्बर्ट आइनस्टाइन म्हणाले, ते अमेरिकेकडे बघून अगदी पटते. अशा स्थलांतरितांनीच तर अमेरिका उभी केली. नाही तर अमेरिकेकडे होतेच काय? त्या अमेरिकेला आता अचानक ‘देशी’ व्हावेसे वाटू लागले आहे. अमेरिकेने परदेशी विद्यार्थ्यांना छळणे सुरू केले आहे. त्यात भारतीय विद्यार्थी सर्वाधिक आहेत. त्यानंतर चीन. आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अमेरिका इतर देशांची आर्थिक नाकेबंदी करत आहे. त्याला आव्हान देण्याचा प्रयत्नही जगभर दिसतो आहे. गेली काही दशके जागतिकीकरणाची जी प्रक्रिया सुरू होती, आता तिची चक्रे बरोबर उलटी फिरवण्याचा हा प्रकार. जगाची एकत्रित बाजारपेठ तयार करणे, वस्तू, सेवा, भांडवल, तंत्रज्ञान आणि कामगारांची मुक्त हालचाल करणे, त्यातून सर्वांनाच फायदा होणे अशी जागतिकीकरणाची संकल्पना होती. पण आता अमेरिकेसारख्या प्रमुख देशाने ‘लेट्स मेक अमेरिका ग्रेट अगेन’ वगैरे सुरू केल्याने परिस्थिती भयंकर चिघळली.

अमेरिका स्वतःपुरता विचार करत असल्याने तिचे स्वतःचेच नुकसान अधिक होतेय, हे ट्रम्पना कधी कळेल ते समजत नाही. याच स्वार्थांधतेतून अमेरिकेने वर्षभरात सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द केला. त्यासाठी निकष कोणता वापरला गेला? एआयची मदत घेऊन हे उद्योग झाले. एवढेच घडले नाही फक्त. अनेक कोवळ्या तरुणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही त्यांना अडकवले गेले. हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांबद्दल घडले असे नाही. मात्र, सर्वाधिक नुकसान झाले ते भारतीय मुला-मुलींचे. आज जे भारतीय विद्यार्थी परदेशात आहेत, त्यापैकी सर्वाधिक कॅनडा आणि अमेरिकेत आहेत.

अमेरिकेत सुमारे साडेतीन लाख भारतीय विद्यार्थी आहेत. आज यापैकी अनेक विद्यार्थी अडचणीत आले आहेत. काहीजण कायदेशीर लढाई लढत आहेत. मुळात, ज्या मुलांना अमेरिका नावाचे ‘ड्रीम’ खुणावत होते, त्यांना अमेरिकेने आपल्या देशातून हाकलून दिल्यानंतर काय होईल? अमेरिका आजही अनेक अर्थांनी अर्थकारणावर वर्चस्व टिकवून आहे, त्याचा फायदा घेत त्यांना चीनला नामोहरम करायचे आहे आणि आपली एकहाती सत्ता प्रस्थापित करायची आहे. त्यासाठी अमेरिकेला आपली मक्तेदारी सिद्ध करावी लागेल. म्हणून इतरांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न आता जोरकसपणे सुरू झाला आहे. याचा फटका किती देशांना बसणार आहे, ते सोडा. मात्र, खुद्द अमेरिकेतही याच्या विरोधात आवाज उमटत आहे. ‘जगाचे प्राक्तन समान आहे’, हे जागतिकीकरणाचे सूत्र होते.

आज मात्र सर्वजण आपापल्या देशापुरता विचार करत आहेत. एकवेळ हेही समजून घेता येईल; पण इतरांना खलनायक मानण्याचे राजकारण कसे आकाराला येऊ पाहात आहे? ज्या भारतातील तरुणाईला अमेरिकेचे कमाल आकर्षण आहे, तिथूनच ते हद्दपार होत असल्याने त्यांचे अमेरिकाप्रेम ओसरून ते भारतात अधिक रमतील, असे मानायचे की त्यामुळे त्यांनी मोठी संधी गमावली, असे म्हणायचे? सध्या तरी अमेरिका आणि चीन यांच्या वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव झाला आहे. डोळ्यात नवी स्वप्ने घेऊन सातासमुद्रापार गेलेल्या मुलांनाच जिथे तुरुंगात डांबून नंतर परत पाठवले जाते, तिथे या स्वप्नांचे काय होणार आहे? मुद्दा केवळ अमेरिका अथवा चीनचा नाही, मानवी समुदायाचा आहे. व्हिसा घेऊन येणाऱ्या पुढल्या पिढ्यांचा आहे. चिंता आहे, ती म्हणूनच!

टॅग्स :Americaअमेरिकाchinaचीन