शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांची मुजोरी

By admin | Updated: January 15, 2016 03:03 IST

सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणारे वाळूमाफियांचे हल्ले ही चिंतेची बाब आहे. दररोज कुठे ना कुठे हल्ले होत आहेत. बुधवारी सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर

सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणारे वाळूमाफियांचे हल्ले ही चिंतेची बाब आहे. दररोज कुठे ना कुठे हल्ले होत आहेत. बुधवारी सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर झालेला हल्ला ही ताजी घटना आहे. वाळूसारख्या गौणखनिजाची मागणी आणि महत्त्व वरचेवर वाढतच आहे. त्यामुळे त्याची तस्करीही वाढू लागली आहे. ती रोखणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटना देशभर घडत आहेत. महसुली आणि पोलीस अधिकाऱ्यांचे मुडदे पाडल्याच्या घटना घडत आहेत. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. राज्यातील एकही जिल्हा असा नाही की जिथे महसुली कर्मचाऱ्यांवर वाळूमाफियांचे हल्ले झाले नाहीत. विशेषत: अलीकडच्या घटनांमध्ये बीड, पुणे, अकोला, हिंगोली, सांगलीच्या घटनांचा समावेश आहे. बुधवारी सोलापूरचे जिल्हाधिकारी मुंडे यांनी बेकायदा वाळू वाहतूक करणारी वाहने अडविली असता त्यांच्या अंगावरही गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. जिल्हाधिकाऱ्यांवरच जीवघेणा हल्ला होत असेल तर तलाठी अन् तहसीलदारांचे काय होत असेल याची कल्पना येते. राज्यातील विविध वाळू उपशातून सरकारला सुमारे दीड हजार कोटींचा महसूल मिळत असल्यामुळे सरकारी तिजोरीला तो एक मोठा हातभारच समजला जातो. एकदा का वाळूचा ठेका घेतला की नैसर्गिक साधनसंपत्तीचा किती उपसा केला याचे मोजमापच नसल्याने वाळूच्या व्यवसायाला सोन्याची खाण समजले जाऊ लागले. त्यातूनच या नैसर्गिक संपतीला ओरबाडण्यासाठी वाळूचे टेंडर भरण्यावरून ठेकेदारांचे मुडदे पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. केंद्र सरकारच्या पर्यावरण धोरणामुळे राज्य सरकारांना मनसोक्तपणे वाळूउपसा करण्यास मर्यादा आल्या असल्या तरी वर्षाला १५०० कोटीचा महसूल तिजोरीत जमा करणाऱ्या या उत्पन्नावर पाणी सोडण्यास राज्य शासन तयार नाही. वाळूचे ठेके लिलावास उशीर झाला तर वाळूची चोरी रोखणे आवाक्याबाहेर जाते. वाळू आणि ठेके याच्या जवळपासही सर्वसामान्यांना जाता येत नाही. पाण्यासारखा पैसा मिळवून देणाऱ्या या व्यवसायात येणाऱ्यांची स्पर्धा वाढली. आणि त्याला गुन्हेगारीचाही स्पर्श झाला. जिल्हाधिकारी मुंडे यांच्यावर गाडी घालण्याचा प्रकारही त्याच मानसिकतेचा भाग होता. नुकताच मंत्रिमंडळाने अशा गुन्हेगारांसाठी दहशतवादी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याचा अंमल अद्याप सुरू झालेला नाही. प्रत्यक्ष कायद्याचा अंमल सुरु झाल्याशिवाय आणि सरकार त्याची कशी प्रभावीपणे अंमलबजावणी करते यावरच महसुली कर्मचाऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.