शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शंकरबाबा

By admin | Updated: May 12, 2015 06:55 IST

माणुसकीचा गहिवर ज्यांच्या हृदयात आहे, त्यांना शंकरबाबा पापळकर हे नाव अपरिचित नाही. अमरावती जिल्ह्यातील परतवाडानजीकच्या वझ्झर फाटा

गजानन जानभोर -

माणुसकीचा गहिवर ज्यांच्या हृदयात आहे, त्यांना शंकरबाबा पापळकर हे नाव अपरिचित नाही. अमरावती जिल्ह्यातील परतवाडानजीकच्या वझ्झर फाटा येथे शंकरबाबांचे दीडेकशे अपंग, अनाथांचे शापित कुटुंब राहते. या आश्रमात शंभरेक अंध-अपंग, मतिमंद, मूकबधिर मुले-मुली आहेत. संडासात, नालीत किंंवा कचरापेटीत फेकून दिलेल्या या अनाथ मुलांच्या संगोपनाची आणि पुनर्वसनाची तपश्चर्या हा गरीब कार्यकर्ता मांडून बसला आहे. परवा यातील कांती या मुलीचे धनंजय डोळसकर या तरुणाशी अकोल्यात लग्न झाले. वीस वर्षांपूर्वी नाशिकच्या कुंभमेळ्यात ती सापडली. शंकरबाबांनी तिला आश्रमात आणले, मोठे केले, शिकवले आणि आयुष्याचा जोडीदार शोधून जन्मदात्याचे कर्तव्य पूर्ण केले. या फकीराच्या घरातील हे सोळावे लग्न.आपल्या घरात एखादे मतिमंद वा अपंग मूल असेल तर आपण मनाने कायमचे खचलेले असतो. ‘नशिबाचे भोग’ म्हणून त्या निष्पाप जिवाकडे दुर्लक्ष करीत त्याच्या जगण्याचे हक्क नकळत हिरावूनही घेतो. शंकरबाबा मात्र नाव, गाव, जात, धर्म यापैकी काहीच ठाऊक नसलेल्या या मुलांच्या आयुष्यात आनंद घेऊन येण्यासाठी धडपडत असतात. म्हणूनच कचरापेटीत सापडलेल्या ज्योतीला एक दिवस कलेक्टर बनविण्याचे स्वप्न ते पाहतात. ‘रोजी’ या ख्रिश्चन मुलीला ते जसे जन्मदाता वाटतात, त्याच वेळी ‘मुन्नी’ ही मुस्लीम मुलगी त्यांच्यात रक्ताचे नाते शोधण्याचा प्रयत्न करीत असते. रामचंद्र आणि रहेमानला जीव लावताना बाबांची जात आणि धर्म कायमचा गळून पडतो.शैलजा या मूकबधिर मुलीची गोष्ट अशीच. आई-वडिलांनी तिला फेकून दिले. भंडाऱ्यातील एका नालीत ती पडून होती. बाबांनी तिला आणले. ‘कु. शैलजा शंकर पापळकर’ हे नाव दिले. मूकबधिर विद्यालयात ती शिकली. त्याच विद्यालयात शैलजा नोकरीला आहे. तिला पहिला पगार मिळाला तेव्हा त्यांनी तिच्या अभिनंदनासाठी एक खास कौतुक सोहळा आयोजित केला होता. तिचे लग्नही लावून दिले. शंकरबाबांच्या आणखी एका मुलीचे, बालीचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले. तिच्या साक्षगंधाच्या दिवशी शंकरबाबांची पत्नी पंचफुलाबार्इंचे निधन झाले. सर्वजण काही क्षणासाठी सुन्न झाले, त्यांचे सांत्वन करू लागले, बाबा मात्र अविचल. एक क्षण असा आला की, त्यांनाच इतरांचे सांत्वन करावे लागले. आपली पत्नी आता या जगात नाही, ही दु:खद वार्ता त्यांना सकाळीच समजली होती. पण ती सर्वांपासून लपवून ठेवली. मुलीला आयुष्याचा साथीदार मिळवून दिल्याचा आनंद एका डोळ्यात आणि दुसऱ्या डोळ्यात पत्नी कायमची साथ सोडून गेल्याचे दु:ख घेऊन हा माणूस सर्वांसोबत अगदी सहज वावरत होता. सामान्य माणसासारखे त्यांनाही दु:ख झाले असेल, पत्नीसोबत घालवलेल्या संसारातील आठवणींनी तेही व्याकुळ झाले असतील. नात्यांचे कोवळे बंध त्यांनाही अस्वस्थ करीत असतील. पण मुलीला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करताना हा माणूस सर्वांनाच फसवून दिवसभर आतून रडत होता. अपंग, मतिमंदांचे केवळ संगोपनच नाही तर त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे शंकरबाबा सांगतात. त्यासाठीच त्यांची दिवस-रात्र धडपड सुरू असते. ‘१८ वर्षांवरील अनाथ मतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी भारत सरकारने कायदा करावा’, ही त्यांची तगमग त्याच धडपडीचा एक भाग आहे. आई-वडिलांनी टाकून दिलेल्या देशातील लाखो मतिमंद मुलांच्या भविष्याची चिंंता त्यांना भेडसावीत असते. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अशा मुलांना अनाथाश्रमात ठेवता येत नाही. देशात दरवर्षी अशी एक लाख मुले अनाथाश्रमाबाहेर पडतात. ती मग कुठे जातात? सरकारही आपली संवेदना हरवून बसले आहे, हा शंकरबाबांचा सात्त्विक संताप आहे. आपण गेल्यानंतर या मुलांचे कसे होईल, या प्रश्नाने ते अलीकडे व्याकुळ होतात. परवा सासरी निघालेल्या कांतीला आशीर्वाद देताना चेहऱ्यावरील ही अस्वस्थता त्यांना पहिल्यांदाच लपवता आली नाही.