शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

आता दिल्लीत डागडुजी, बदल.. आणि कदाचित धक्केही! मोदी मोठे निर्णय घेणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 09:04 IST

नजीकच्या काळात केंद्र सरकारमध्ये काही बदल होतील. काही मंत्र्यांना पक्षकार्यासाठी पाठवले जाईल. पंतप्रधान सध्या नव्या गुणवत्तेच्या शोधात आहेत !

हरीष गुप्ता नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या रचनेत काही मोठे बदल करू इच्छितात; काही मंत्रालयांची डागडुजी होण्याचीही शक्यता आहे. पंतप्रधान सध्या नव्या गुणवत्तेच्या शोधात आहेत, हे नक्की! नुकतेच मोदींनी शक्तिकांत दास यांना पंतप्रधान कार्यालयात दुसरे प्रधान सचिव म्हणून नेमले. आर्थिक क्षेत्रात सध्या जे काही चालले आहे त्यावर पंतप्रधान समाधानी नसल्याचे हे द्योतक मानले जाते. दास यांना अकल्पितपणे मिळालेल्या या बढतीमुळे राजधानीतल्या सत्तावर्तुळात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक होते, असे सूत्रांकडून समजते. या बदलामागे देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती हा मुद्दा तर होताच, शिवाय संबंधित मंत्रालयांकडून तत्परतेने प्रशासकीय प्रतिसाद न मिळणे हेही एक कारण असल्याची चर्चा सध्या दिल्लीत आहे. अजूनही नोकरशाही अडथळे निर्माण करते, लालफितीचा कारभार चालतो असे म्हटले जाते. अनेक प्रकरणांच्या बाबतीत प्रशासकीय आणि धोरणात्मक बाजूने वेळीच निपटारा झालेला नाही. भारतामध्ये कारभार सुकर होण्याच्या गोष्टी केल्या जात असल्यातरी पदोपदी अडथळे निर्माण होत असल्यामुळे काम करणे कठीण असल्याचे ट्रम्प प्रशासनाने अलीकडेच जाहीरपणे म्हटले होते. स्वाभाविकच काही पायाभूत सुविधा तसेच महत्त्वाच्या आर्थिक क्षेत्राशी संबंधित मंत्रालयांमध्ये उपाययोजना आवश्यक झाली. आता काही बदल दिसतील.

मात्र अशा परिस्थितीत निष्ठावान माणसे शोधणे हाही एक प्रश्न असतो. येत्या ४ एप्रिलला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा संपेल. काही कारणांनी थोडाफार विलंब झाला नाही तर तोवर संघटनात्मक मांडामांड पूर्ण झालेली असेल. सरकारमध्येही काही बदल होतील. काही मंत्र्यांना पक्षाचे काम करण्यासाठी पाठवले जाईल. कारण भविष्यात अनेक आव्हानांना सामोरे जावयाचे आहे. सर्वसाधारणपणे शपथविधी समारंभानंतर काही वर्षे जाऊ देऊन मोदी अशाप्रकारचे बदल करतात; परंतु चाकोरीबाहेरचा विचार करू शकणारी नवी गुणवत्ता आता त्यांना हवी आहे. जागतिक आव्हाने समोर ठेवून यातून मार्ग काढण्यासाठी असे करणे गरजेचे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात काही धक्के बसतील असे दिसते.

... अखेरीस रेखा गुप्ता !मोदी सरकार २०१४ पासून महिला नेत्याच्या शोधात होते. मोदी दिल्लीत आले तेव्हा अनेक प्रमुख महिला नेत्या पक्षाकडे होत्या. परंतु, जसजसा काळ पुढे सरकला तशी परिवाराशी जोडल्या गेलेल्या प्रमुख महिला नेत्यांची गरज भाजपला कायमच जाणवत राहिली. आपला ठसा ज्याच्यावर असेल अशा नव्या नेत्याच्या शोधात मोदी होते. आणि शेवटी रेखा गुप्तायांच्या रूपाने त्यांना तसे नेतृत्व सापडले.

रेखा गुप्ता या प्रारंभापासून संघ परिवाराशी जोडल्या गेलेल्या असून, पक्षात विविध स्तरावर त्यांनी काम केले आहे. निवडून आलेल्या आमदारांनी रेखा गुप्ता यांची नेतेपदी औपचारिक निवड करण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या आधीच मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होऊन मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झालेले होते.

रेखा गुप्ता यांची निवड करण्याची मोदी यांची पद्धत माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासाठी मात्र चिंतेची बाब ठरू शकते. दिल्ली भाजपचा चेहरा म्हणून माध्यमातल्या काही मंडळींनी इराणी यांना समोर ठेवले होते. मीनाक्षी लेखी याही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होत्या. भाजपच्या हिमाचलातील खासदार कंगना राणावत काही प्रभाव टाकू शकल्या नाहीत. रेखा गुप्ता मात्र पहिल्यांदाच निवडून आल्या. यापूर्वी त्यांचा दोनदा पराभव झाला आहे. एकाअर्थाने त्या अचानक समोर आल्या. दिल्ली हा देशाचा चेहरा आहे. तेथे डबल इंजिनचे सरकार आल्यावर रेखा गुप्ता यांना काही ठोस करून दाखविण्याची संधी आहे. परंतु, त्यांना त्यासाठी आपली क्षमता सिद्ध करावी लागेल हेही तितकेच खरे.harish.gupta@lokmat.com

टॅग्स :delhiदिल्ली