शहरं
Join us  
Trending Stories
1
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
2
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
3
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
4
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
5
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
6
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
7
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
8
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
9
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
10
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
11
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
12
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
13
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
14
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
15
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
16
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
17
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
18
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
19
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
20
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

...आता पुरे झाला जनता कर्फ्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:59 IST

मिलिंद कुलकर्णी कोरोनाशी लढण्यासाठी ६९ दिवस नागरिकांनी स्वत:ला घरात कैद करुन घेतले. व्यापार, व्यवसाय, उद्योग, नोकरी हे सगळे थांबविण्यात ...

मिलिंद कुलकर्णी
कोरोनाशी लढण्यासाठी ६९ दिवस नागरिकांनी स्वत:ला घरात कैद करुन घेतले. व्यापार, व्यवसाय, उद्योग, नोकरी हे सगळे थांबविण्यात आले. आता रहाटगाडे सुरु व्हायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक ०.१ जाहीर केले तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ‘पुनश्च हरिओम’ असे संबोधन देत तीन टप्प्यात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. यामुळे अर्थचक्र पूर्ववत सुरु होईल, अशी अपेक्षा असताना काही शहरांमध्ये स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन करीत आहेत, हा शासनकर्त्याच्या धोरणाला छेद देण्याचा प्रकार आहे.
‘जनता कर्फ्यू’चा उद्देश चांगला आहे, त्यामागील प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींची भावना चांगली आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु, ६९ दिवसांचे चार लॉक डाऊन अनुभवल्यानंतर आता फुटकळ दोन-पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूने खूप काही साधले जाईल, असा आशावाद व्यक्त करणे भाबडेपणा ठरेल.
जनता कर्फ्यूचे समर्थन करणाऱ्यांची संख्या दखलपात्र आहे. रस्त्यावरील गर्दी, मास्कचा वापर न करणे, शारीरिक अंतर न राखणे अशा गोष्टी सर्रास घडत असल्याने दोन दिवस-आठवडाभर कर्फ्यू लावा, सगळे बंद ठेवा, असा समर्थन करणाºया मंडळींचा दावा असतो. त्यांची तळमळ, कळकळ योग्य असली तरी ६९ दिवसांच्या लॉकडाऊनने समाजाला काही धडे दिले आहेत. शिस्त लावली आहे. कोरोना हा जीवावर बेतणारा संसर्गजन्य आजार असल्याने प्रत्येकाला त्याचे गांभीर्य पुरेसे कळले आहे. वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधन, जनजागृती झाली आहे. आता संचारबंदीचा टप्पा आपण ओलांडला आहे. ‘कोरोना’ला सोबत घेऊन, पुरेशी खबरदारी बाळगून आयुष्याला, रहाटगाड्याला सुरुवात करण्याची वेळ आली आहे.
कोरोनाचे अधिक रुग्ण ज्या भागात आहेत, त्या प्रतिबंधित क्षेत्रात कठोर निर्बंध ठेवायला कोणाचाही विरोध राहणार नाही. परंतु, सरसकट सगळीकडे संचारबंदी अयोग्य आणि चुकीची आहे. निसर्गचक्र बदलत आहे. पावसाळा येतोय. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकºयाची पेरणीपूर्व तयारी सुरु झाली आहे. बांधावर बियाणे आणि खते देण्याचा राज्य शासनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्याची अंमलबजावणी बºयापैकी होत आहे. परंतु, त्यासोबत इतरही तयारी शेतकºयाला करावी लागते. औजारे, बैल-गाड्या खरेदी, दुरुस्ती अशा गोष्टींमध्ये संचारबंदीचा खोडा असू नये.
शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. शाळा कधी सुरु करायच्या हा निर्णय सरकारने अजून घेतलेला नाही. परंतु, पूरक तयारी पालक आणि विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे. गणवेश, पाठ्यपुस्तके इतर शालोपयोगी साहित्य हे खरेदी करण्यासाठी दुकाने उघडायला हवीत. लहान मुलांचे भावविश्व लक्षात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय संवेदनशील पध्दतीने हाताळायला हवा.
उद्योग सुरु करण्यासाठी सरकारने परवानगी आणि प्रोत्साहन दिले आहे. मुळात हे उद्योग सुरु झाले, उत्पादन तयार झाले, पण हे विकायचे कोठे? दुकानांना तर परवानगी दिलेली नाही. मग माल तयार करुन ठेवायचा तरी किती हा प्रश्न उद्योजकांना पडला आहे.
व्यापारी संकुलातील दुकानांना परवानगी नाही, हा निर्णयदेखील व्यापार, व्यवसायाला मारक आहे. बहुसंख्य व्यापार हा संकुलांमधून चालतो. त्याठिकाणी कोरोनाविषयक खबरदारी घेण्यासाठी व्यापारी संघटनांवर जबाबदारी टाकायला हवी. सम-विषम सारखे उपाय राबवून पहायला हवे. पण सरसकट बंद ठेवणे, हा अर्थचक्राला खीळ घालणारा प्रकार आहे.
लॉकडाऊन उठविताना केंद्र आणि राज्य सरकारांच्या भूमिकांमध्ये फरक आहे. दोन्ही सरकारांनी काढलेल्या आदेशांमधून ते ठळकपणे दिसते. केंद्र सरकार शिथिलतेच्या बाजूने असताना राज्य सरकार मात्र ‘आस्ते कदम’च्या भूमिकेत दिसत आहे. देशातील सुमारे ४० टक्के रुग्ण हे महाराष्टÑातील आहेत. त्यामुळे पुरेशी खबरदारी, काळजी घेण्याची सरकारची भूमिका रास्त असली तरी अर्थचक्राला गती देण्यासाठी धाडसी भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणेला अधिक मजबूत बनविणे आणि दुसरीकडे अर्थचक्राला गती देणे ही मोठी आव्हाने सरकारपुढे राहणार आहे. त्यात अशा जनता कर्फ्यूसारखे अडथळे चुकीचे आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव