शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नितीशकुमारांचे ‘बंड’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 00:36 IST

नितीशकुमारांच्या जनता दल (युनायटेड) या पक्षाने मोदींच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरुद्ध बंड पुकारण्याची भूमिका आपल्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात घेतली आहे. आगामी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा बिहारमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून नितीशकुमारांना मान्यता द्या ही त्या पक्षाची मोदींकडे मागणी आहे

नितीशकुमारांच्या जनता दल (युनायटेड) या पक्षाने मोदींच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरुद्ध बंड पुकारण्याची भूमिका आपल्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात घेतली आहे. आगामी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा बिहारमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून नितीशकुमारांना मान्यता द्या ही त्या पक्षाची मोदींकडे मागणी आहे. सध्याही तेच बिहारचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना रालोआचा पाठिंबा आहे. हीच स्थिती त्या पक्षाला यापुढेही कायम राहायला हवी आहे. अशी मागणी मोदींचा भाजप किंवा रालोआ निवडणुकीपूर्वी मान्य करील अशी त्यांची मानसिकता नाही. भाजपची भूमिका आरंभी सहकार्याची राहिली तरी पुढे ती आक्रमकच नव्हे तर सर्वंकष होते. आपली गरज म्हणून त्या पक्षाने आज नितीशकुमारांचे मुख्यमंत्रिपद स्वीकारले असले तरी त्याला त्या राज्यात स्वत:ची सत्ता आणायची आहे. भाजप हा पक्ष तसाही नितीशकुमारांचे पद वा मुख्यमंत्रिपद राखायला त्याचे राजकारण करीत नाही. त्याचे बिहारमधील नेते व उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हे स्वत:च मुख्यमंत्रिपदाची बाशिंगे बांधून आहेत व त्यांचे तसे असणे हे गैरही नाही. नितीशकुमारांच्या पक्षाला मात्र बिहारमध्ये व देशातही त्यांच्या नेतृत्वावाचून तारून नेणारी दुसरी कोणतीही शक्ती नाही. त्यामुळे आपला भविष्यकाळ सुरक्षित करण्यासाठी त्याने आपली मागणी अगोदरच पुढे रेटली आहे. नितीशकुमारांनी लालूप्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस यांच्या मदतीने बिहारची निवडणूक जिंकली. मात्र पुढे त्या दोन्ही पक्षांचा विश्वासघात करून भाजपसोबत आताचे आपले सरकार बनविले. परिणामी त्यांना भाजपेतर पक्षात मान नाही व स्थानही नाही. त्यामुळे भाजपचा विश्वास राखणे व आपल्या मागण्या वाढवीत नेणे हे महाराष्ट्रातील शिवसेनेचे राजकारण करण्याचा मार्ग त्यांनी आता अनुसरला आहे. त्याचसाठी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड व मणिपूर या चार राज्यात होऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणुकीत भाजपसोबत न राहता त्यातील अनेक जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला आहे. आपल्या मागणीचा दबाव वाढविण्याचाच त्यांचा हा पवित्रा आहे. भाजपने त्याबद्दल आपली प्रतिक्रिया अजून व्यक्त केली नसली तरी ते याला भीक घालील असे त्याने काश्मिरातील मेहबुबा मुफ्ती सरकारबाबत घेतलेल्या भूमिकेवरून वाटत नाही. तसे तो वागला तर मात्र नितीशकुमारांच्या व त्यांच्या पक्षाच्या वाट्याला एक राजकीय निर्वासितपण येणार आहे. भाजप त्यांना जवळ करणार नाहीत आणि भाजपेतर त्यांना सोबत घेणार नाहीत. एका अर्थाने नितीशकुमारांनी ओढवून घेतलेले हे दुर्दैवी प्राक्तन आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्याकडे मोदीचा पर्याय म्हणून देश पाहू लागला होता. त्यांनी लालूप्रसादांच्या मदतीने बिहार हे राज्य जिंकले तेव्हाची त्यांची प्रतिमा राष्ट्रीय होती. आता ती नुसती प्रादेशिकच नाही तर अर्धप्रादेशिक बनली आहे. ती फुगवून मोठी करण्याचे त्यांचे आत्ताचे राजकारण त्यांना मोठे करण्याऐवजी मोडित काढणारेच अधिक आहे. एकेकाळचा हा समाजवादी नेता भाजपच्या आहारी गेला असेल आणि आता तो त्याच्याशीही राजकारण करीत असेल तर त्याचा विश्वास कुणाला वाटेल? राजकारण हा केवढ्याही व कशाही तडजोडींचा खेळ असला तरी त्यालाही जनतेच्या विश्वासाची गरज आहे. नितीशकुमारांनी अल्पावधीत एवढ्या कोलांटउड्या घेतल्या आहेत की त्यांना हा विश्वास प्राप्त होणे आता अवघडही ठरणार आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपा