शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

एका दगडात अनेक

By admin | Updated: October 12, 2015 22:11 IST

मुंबईतील इंदू मिल्सच्या भूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजीत स्मारकाचे भूमीपूजन करताना आणि त्याच्याही आधी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारुन घेतले

मुंबईतील इंदू मिल्सच्या भूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजीत स्मारकाचे भूमीपूजन करताना आणि त्याच्याही आधी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारुन घेतले, असे म्हणता येईल? देशातील मागासवर्गीयांना राज्यघटनेने बहाल केलेले आरक्षण मोदी सरकारच काय, पण कोणीही रद्द करु शकत नाही असे नि:संदिग्ध प्रतिपादन करुन त्यांनी रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना तर इशारा दिलाच पण भागवतांनी आरक्षणनीतीच्या फेरविचाराची जी आवश्यकता बोलून दाखविली होती व ज्या विधानामुळे देशातील यादवादि तमाम दलितोद्धारकांनी जी कावकाव सुरु केली होती, ती बंद करुन टाकली. त्याचबरोबर खुद्द मोदींच्या राज्यात पाटीदारांना आरक्षण देण्याच्या मागणीआडून जातीधारित आरक्षणाच्या विरोधात आंदोलन सुरु करणाऱ्या हार्दीक पटेल यालाही उत्तर देऊन टाकले. एकीकडे जातीधारित आंदोलनाला विरोध करायचा आणि दुसरीकडे जातीधारित आंदोलनाचा व्याप वाढविण्याच्या प्रयत्नातील नितीशकुमार यांना पाठिंबा देऊन भाजपाला बिहारात पराभूत करण्याच्या वल्गना करायच्या यातच हार्दीक पटेल यांचे गोंधळी वावदूकगिरी उघड होते. अर्थात पंतप्रधानांनी स्वत: याबाबतीत स्पष्टीकरण केल्यानंतरही लालूप्रसाद आणि प्रभृतींची आगपाखड थांबेलच असे नाही. मोदींनी प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दरम्यान जसे अनेक पक्षी गारद केले तसेच कार्यक्रमापूर्वीही काही केले. घटनाबाह्य सत्ताकेन्द्र चालविणे आणि सत्तेचे सारे लाभ घेताना जबाबदाऱ्या मात्र इतरांवर ढकलायच्या याचे बाळकडूच शिवसेनेला मिळालेले असल्याने आपण जरी अष्टौप्रहर भाजपाला दुमत्यात घालीत असलो तरी पंतप्रधानांच्या या कार्यक्रमात आपल्याला व्याह्याचा मान मिळावा अशी शिवसेनेची अपेक्षा होती. पण दुर्लक्षून एखाद्याची कशी उपेक्षा करावी याचा जणू वस्तुपाठच या निमित्ताने मोदींनी घालून दिला. ‘मी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात तिसऱ्या कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही’ असेही मोदी यांनी यावेळी दाखवून दिले. यातून एकप्रकारे कखित शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्यात दुभंग निर्माण झाल्याचे चित्रही समोर आले. अर्थात शिवसेनेला मोदींपेक्षा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंचे मोल अधिक वाटावे ही त्यातल्या त्यात एक चांगली आणि स्वागतार्ह बाब मानावी लागेल. मोदींनीही तिचे स्वागत करुन टाकावे.