शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

सुज्ञांचे हरपले भान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 1:31 PM

मिलिंद कुलकर्णी कोरोनाचा संकटकाळ हा कसोटीचा आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि सरकार या दोघांनी घालून दिलेल्या नियमाचे पालन केले ...

मिलिंद कुलकर्णीकोरोनाचा संकटकाळ हा कसोटीचा आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि सरकार या दोघांनी घालून दिलेल्या नियमाचे पालन केले तर जीव वाचणार आहे, अन्यथा... हे माहित असल्याने प्रत्येक घटक काळजी घेत आहे. ह्यजान है तो जहाँ हैह्ण पासून तर ह्यजान भी और जहाँ भीह्ण पर्यंत आपल्या लॉकडाऊनच्या चार पर्वांचा प्रवास झाला आहे. रेड, आॅरेंज आणि ग्रीन झोन अशा विभागणी झाल्यानंतर चौथ्या पर्वात रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोनच विभाग करण्यात आले आहे. ७९ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये सामान्य नागरिकाच्या सहनशीलतेची परीक्षा सुरु आहे, हे अगदी कबूल आहे. पण हे सगळे आपल्या जीवासाठी सुरु आहे, हे कळायला हवे. दुर्देव असे की, सुशिक्षित, समंजस, सुज्ञ मंडळीचे भान हरपले आहे.कोरोनामुळे एकंदर जीवनशैलीत झालेला बदल आपण अनुभवतोय. लॉकडाऊनमुळे शिस्त लागली आहे. दूध, भाजीपाला, किराणा, औषधी, वर्तमानपत्रे अशा अत्यावश्यक बाबींसाठी केवळ आपण बाहेर पडतो किंवा घरपोच मागवत आहोत. जिल्हाबंदी असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी एस.टी., रेल्वे ही साधने नाही. असे असताना मरण व तोरणदाराचे कार्यक्रमदेखील शारीरिक अंतराचे पालन करुन साजरे व्हायला हवेत. त्यासाठी शासनाने उपस्थितांची संख्या निश्चित करुन दिली असतानाही आम्ही बडेजावासाठी ते पायदळी तुडवत असू तर नुकसान आमचे आणि आपल्या संपर्कातील स्नेहीमंडळींचे करीत आहोत, हे सुज्ञांना का कळत नसेल काय?निश्चित झालेले लग्न मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत साजरे करण्याचा मोठेपणा अनेक जणांनी दाखविला. त्यांच्या पुढाकाराचे समाज, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून कौतुक झाले.मात्र कोरोना रुग्ण किंवा कोरोना संशयित व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी सगळे नियम पाळणे आवश्यक आहे. ते पाळले न गेल्याने रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. अमळनेरात एका अंत्ययात्रेमुळे कल्लोळ झाला. शंभरावर रुग्ण या शहरात आढळले. भडगावात तेच झाले. एका महसूल अधिकाऱ्याच्या नातलगाच्या अंत्ययात्रेला २००-२५० लोक उपस्थित होते. वैकुंठधाम ऐवजी शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि त्याचा परिणाम भडगावात ४५ रुग्ण आढळून आले. जळगावातील वाघनगरात अमळनेर, भडगावची पुनरावृत्ती झाली. मृतदेह रात्रभर घरात ठेवला आणि सकाळी अंत्यसंस्कार केले. एकाच घरातील १९ हून अधिक लोक बाधित झाले.घरातील व्यक्तीचे निधन होणे ही दु:खदायक बाब आहे. भावनिक नाते असते. ऋणानुबंध असतात. पण कोरोना साथीच्या काळात काळजावर दगड ठेवून आपण स्वत:साठी आणि नातेवाईकांसाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता आहे.तीच अवस्था व्यावसायिकांबाबत घडत आहे. संसर्गजन्य रोग असल्याने शारीरिक अंतर पाळणे, मास्क वापरणे, सातत्याने हात धुणे हे ६० दिवसांमध्ये आपल्या अंगवळणी पडले आहे. या काळात सगळ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नोकरदारांवर नोकरकपात किंवा पगार कपातीची कुºहाड कोसळली आहे तर व्यावसायिकांबाबत आर्थिक चक्र ठप्प झाल्याचे आक्रित घडले आहे. नाईलाज असल्याने निमूटपणे सारे हे सहन करीत आहेत. २०२० हे वर्ष नफा-तोट्यापेक्षा स्वत:ला सुरक्षित राखणे यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तरीही स्वार्थांध मोजक्या मंडळींकडून छुप्या पध्दतीने दुकाने सुरु करण्याचा प्रयत्न होत आहे. शासनाचा दंडुका बसला की, मग ही मंडळी सुतासारखी सरळ होते. जळगावात तर आश्चर्य घडले. पहाटे चार वाजता दुकाने सुरु होती आणि कामकाज चालू होते. का आपण कोरोनाला आमंत्रण देत आहोत हा प्रश्न अशा घटना पाहिल्यावर पडतो.धक्कादायक घटना पुन्हा जळगावातच घडली. उच्चभू्र वर्गातील महिलांनी एका अपार्टमेंटमध्ये किटी पार्टी केली. ३३ महिला एका फ्लॅटमध्ये एकत्र आल्या, जेवल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कारवाई केली. आता प्रतिष्ठित कुटुंबातील महिला असल्याने गुन्हा दाखल होऊ नये म्हणून प्रयत्न झाला. नंतर बातमी प्रसिध्द झाल्यावर हा काय मोठा गुन्हा होता काय, अशी विचारणा वर्तमानपत्रांना झाली. मजूर शेकड्याने पायी आणि वाहनाने जात असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही, आणि या महिलांवर कशासाठी हा युक्तीवाद तर हास्यास्पद होता. स्थलांतरितांचे दु:ख अद्याप सुशिक्षित, सुज्ञ मंडळींपर्यंत पोहोचलेले नाही. कोरोनात किटी पार्टी टाळली असती तर काय आभाळ कोसळले असते काय? आम्ही भान ठेवत नाही आणि विस्फोट झाला तर पुन्हा प्रशासनावर खापर फोडायला मोकळे असतो. हा दांभिकपणा झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव