शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
3
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
4
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
5
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
7
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
8
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
9
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
10
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
11
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
12
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
13
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
14
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
15
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
16
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
17
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
18
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
19
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
20
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

भावकी आणि भाऊबंदकीची लेटेस्ट खबर!!!

By सचिन जवळकोटे | Published: November 26, 2020 2:50 AM

कोरोनाच्या प्रकोपामुळे नारदमुनी बिचारे पृथ्वीतलावर अडकून पडले आहेत. स्वर्गलोकाशी सुरू असलेल्या त्यांच्या झूम मीटिंग्सचा वृत्तांत दर १५ दिवसांनी..

सचिन जवळकोटे

इंद्र दरबार आज खचाखच भरलेला होता; पण सगळीकडे मात्र पुरता सन्नाटा पसरलेला. प्रत्येकजण खाली मान घालून बसलेला, कारण प्रत्येकाच्या हातातला मोबाइल चमकत होता. ‘अमृता वहिनीं’चा गळा ‘लतादीदीं’पेक्षाही किती सुरेल, हे पटवून देणारी ‘डिजिटल भक्तां’ची पोस्ट पाहण्यात काहीजण दंग होते. सांगलीच्या ‘सदाभाऊं’नी कोल्हापूरच्या ‘शेट्टीं’कडं बघत म्हटलेलं ‘याद तेरी आयेगीऽऽ मुझको बडा सतायेगीऽऽ’ हे गाणं ऐकण्यातही काहीजण रमले होते. 

एवढ्यात इंद्र महाराजांना नारदांनी ‘झूम कॉल’ केला. स्क्रीनवर  पहात महाराजांनी प्रश्न केला, ‘दरबारात हजर होण्याऐवजी भुतलावरून  असा आभासी संपर्क का  साधताहात नारदा?’  हातातली वीणा वाजवत नारद उत्तरले, ‘क्षमा असावी महाराजऽऽ कोरोनामुळे सर्वत्र संचार करण्यावर बरीच बंधनं आलीत. त्यामुळे मी इथंच अडकून पडलोय.’  ‘पण  मुंबईत सारं ठीक आहे ना’ - या प्रश्नावर मुनी उत्तरले, ‘मंत्रालय ठीक; परंतु इथला निम्मा कारभार ‘मातोश्री’वरूनच ऑनलाइन चालतो महाराज.’ दचकलेल्या दरबारातून प्रतिप्रश्न केला गेला, ‘मग बाकीचं मंत्रालय कोण चालवत?’

गालातल्या गालात हसत नारद उत्तरले, ‘बाकीचं ‘कृष्णकुंज’वरून चालतं. इकडे जेवढे रोज ‘लाइव्ह  होतात, तेवढीच माणसं तिकडं प्रत्यक्ष भेटायला जातात.’ गोंधळलेल्या महाराजांनी पुन्हा पुढं विचारलं,  ‘मग राज्याचा कारभार नेमकं चालवतं तरी कोण’  आता मात्र गंभीर होत नारद मुनी सांगू लागले, ‘हेच विचारण्यासाठी मी ‘मलबार हिल’च्या ‘भवना’त गेलो; पण तिथून मला थेट ‘बारामती’ला पाठवण्यात आलं. तिथं ‘थोरले काका’ काही भेटले नाहीत. ‘धाकटे दादा’ मात्र लाडक्या ‘ताईं’च्या आग्रहाखातर फायलींवर फटाफट सह्या ठोकत होते’. हे ऐकून कौतुकाश्चर्यानं इंद्र महाराजांचा पुढचा प्रश्न कानावर आदळला, ‘अरे वा.. म्हणजे ‘बारामती’ची भावकी आता गुण्यागोविंदानं नांदू लागली म्हणायचं. पण हा आदर्श राज्यातील इतर घराणी का घेत नाहीत...’ लोकांच्या मनातला प्रश्न विचारला जाताच मुनी म्हणाले, ‘हेच तर मराठी राजकारणाचं दुर्दैव म्हणायचं. ‘परळी’च्या भावा-बहिणीला  ‘थोरल्या काकां’नी एकाच बैठकीत बसून उसाचा रसही पाजला, मात्र ऊसतोड कामगारांच्या कोयत्यासारखीच दोघांची जीभ धारदार राहिली, महाराज. ‘पुसद’च्या ‘नाइकां’ची पुढची पिढी वडीलधाऱ्यांच्या पायाला हात लावत असली तरी दोन्ही भावंडांच्या मधून राजकीय विस्तू काही जाता जात नाही. ‘अकलूज’च्या मोठ्या ‘पाटलां’ना ‘कमळा’नं ‘मोहित’ केल्यानंतर ‘बारामतीकरां’नी ‘धाकट्यां’च्या हातात अप्रत्यक्षपणे ‘धवल घड्याळ बांधलं’ ‘पण मग मुनीवर,  ‘नाशिक’ची ‘हिरे’ भावंडं आता जशी एकमेकावर उघडपणे आरोप करण्याचं टाळतात, तसं ‘साताऱ्या’त का होत नाही.’

अजून एक प्रश्न विचारला जाताच नारदांनी डोकं खाजवलं, ते म्हणाले, ‘दिल्लीत नरेंद्र, मुंबईत देवेंद्र अन् साताऱ्यात शिवेंद्र असा जबरदस्त फार्म्युला निवडणुकीत ठरला होता. मात्र तिकडं नागपूरचे पंत लटकले अन् इकडं बिच्चारे साता-याचे धाकटे राजे अडकले. ‘माण-खटाव’च्या ‘गोरे’ भावंडांनी तर निवडणुकीपूर्वीच ‘कमळ-धनुष्यबाणा’ची युती तोडलेली. दोघे एकमेकांच्या विरोधात  लढले होते, महाराज!’ 

‘पण मुनीवर, गेल्या वर्षी पहाटे गुपचूप शपथ घेणारे ‘धाकटे दादा’ यंदा मात्र दिवाळीच्या पहाटे आपल्या आप्तेष्टांसोबत अभ्यंगस्नानासाठी जमले होते. भावकी टिकविण्याची जी कला या घराण्याला जमली, तशी बाकीच्या घराण्याची भाऊबंदकी कशी संपणार..’  इंद्र महाराजांनी पुन्हा तोच प्रश्न रेटून विचारला, तेव्हा मिस्कीलपणे हसत हळूच मुनी उत्तरले, ‘ज्या दिवशी ‘थोरले काका’ आपल्या गाडीत रोहित अन् ‘पार्थला एकत्र घेऊन फिरतील, त्याचवेळी इतर भाऊबंदकीही नक्कीच संपुष्टात येईल, तोपर्यंत नारायणऽऽ नारायणऽऽऽ’’

(लेखक लोकमत सोलापूर आवृत्तीचे संपादक आहेत)

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस