शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैया व हार्दिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2016 03:45 IST

दोघेही तरुण आहेत. दोघांनी विशिष्ट भूमिका घेतली आहे. त्यांची भूमिका विद्यमान सरकारच्या विरोधातली किंबहुना सरकारला उघड आव्हान देणारी आहे.

दोघेही तरुण आहेत. दोघांनी विशिष्ट भूमिका घेतली आहे. त्यांची भूमिका विद्यमान सरकारच्या विरोधातली किंबहुना सरकारला उघड आव्हान देणारी आहे. कदाचित त्यामुळेच सरकारच्या लेखी दोघे ‘राष्ट्रद्रोही’ आहेत. तरीही दोघांच्या मागे बऱ्यापैकी जनसमर्थन आहे. फरक इतकाच की हार्दिक पटेल याला लाभलेल्या समर्थनाला कोणताही नेमका आणि विशिष्ट चेहरा वा तोंडावळा नाही पण कन्हैयाकुमार त्या बाबतीत नशिबवान आहे. भले तो डाव्या चळवळीतून पुढे आला असला वा त्या मार्गाने जाऊ इच्छित असला तरी त्याला देशातील समस्त विरोधी पक्षांचे, विचारवंतांचे, बुद्धिमंतांचे, साहित्यिकांचे आणि कलाकारांचेही समर्थन प्राप्त झाले आहे आणि म्हणूनच कारावासातून त्याची तत्काळ मुक्ततादेखील होऊ शकली आहे. पण या सर्व बाबतीत हार्दिक पटेल अत्यंत कमनशिबीच समजला पाहिजे. देशद्रोहाच्या आरोपाखाली गेल्या कित्येक महिन्यांपासून तो कारागृहात खिचपत पडला आहे. पण त्याच्याकरिता सहानुभूतीचा एखादा शब्ददेखील अद्याप कोणी उच्चारलेला नाही. आता तर काय म्हणे सूरतच्या कारागृहात त्याच्याजवळ मोबाईलची बॅटरी आणि चार्जर (मोबाईल नव्हे) सापडले म्हणून त्याच्या विरुद्ध सूरतच्या न्यायालयात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला गेला आहे. देशातील सर्व कारागृहे अत्यंत खतरनाक अशा गुंडांसाठी कशी नंदनवने आहेत याच्या सुरस आणि सुरम्य कथा नेहमीच प्रसिद्ध होत असतात. त्यांच्याकडे केवळ मोबाईल फोन किंवा त्याहून सक्षम संदेशवहन यंत्रणाच असतात असे नव्हे तर अत्यंत खतरनाक अशी प्राणघातक हत्त्यारेही असतात. पण त्यांना त्यासाठी कधी शिक्षा झाली आहे असे ऐकिवात येत नाही. हार्दिकच्या विरोधात मात्र चपळाईने कारवाई केली जाते. देशद्रोहाचा ठपका ठेवण्याइतपत त्याचा गुन्हा काय, तर त्याने गुजरात राज्यातील पाटीदार म्हणजे पटेल समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली आणि मोठे आंदोलन उभे केले. अगदी अलीकडे राजस्थान-हरयाणा-पंजाब आदि राज्यांमध्ये मोठ्या संख्येत असलेल्या जाट समाजानेही आरक्षणासाठीच उग्र आणि अत्यंत हिंसक आंदोलन छेडले होते. देशाच्या राजधानीलाच त्यांनी वेठीस धरले होते. परंतु जाटच कशाला देशाच्या बव्हंशी राज्यांमध्ये कोणती ना कोणती जात, पोटजात वा उपजात आरक्षणाची मागणी करीत असते व प्रसंगी त्यातून हिंसाचारही घडून येत असतो. पण त्यासाठी आजतागायत कोणालाही देशद्रोही म्हणून संबोधले गेलेले नाही. हार्दिक मात्र देशद्रोही ठरवला गेला आहे. त्याची कुणालाही कणव येत नाही. पंतप्रधान गुजरातचे, हार्दिक त्याच राज्यातला तेव्हां परस्पर काट्याने काटा निघत असेल तर कशाला उगाच मध्ये पडा असा विचार करुन एकाही पक्षाला वा नेत्याला हार्दिकचा कळवळा येत नसेल तर मग कोणीही समानतेचा व समान दृष्टीकोनाचा दावा करु नये हेच बरे. पुन्हा हा प्रश्न जर-तरचा नाही. हार्दिकचे आंदोलन धगधगत होते तेव्हांच बिहारच्या निवडणुकीचे वातावरणही तप्त होत होते आणि नितीश-लालू आदिंनी हार्दिकला त्यांचा हार्दिक पाठिंबा जाहीर केला होता!