शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तसे न होते तर?

By admin | Updated: March 25, 2016 03:23 IST

समजा बांगला देशच्या मुशफिक्र रहमान आणि महमुद्दुला या दोन्ही फलंदाजांना विजयाचा फटका मारण्याची सुरसुरी आली नसती आणि त्यांनी टुकुटुकु खेळून संयमाचे प्रदर्शन करी आपल्या

समजा बांगला देशच्या मुशफिक्र रहमान आणि महमुद्दुला या दोन्ही फलंदाजांना विजयाचा फटका मारण्याची सुरसुरी आली नसती आणि त्यांनी टुकुटुकु खेळून संयमाचे प्रदर्शन करी आपल्या संघाला विजय मिळवून दिला असता तर काय झाले असते? आज हिरो ठरवला गेलेला हार्दिक पंड्या किती बोगस गोलंदाज आहे, धोनीच्या नेतृत्वात कसा कस राहिलेला नाही, भारतीय क्रिकेट संघ कसा गल्ली क्रिकेट खेळण्याच्याही लायकीचा राहिलेला नाही आणि सरतेशेवटी ‘खात्रीने सांगतो, मॅच फिक्स झाली होती हो’ अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊन धोनीसकट त्याच्या संपूर्ण संघाची बंगळुरुबाहेर पडणारी वाट रोखली गेली असती की नाही? १८ चेंडूत २७ धावा हे सतराव्या षटकानंतरचे समीकरण अखेरच्या षटकात १२ चेंडूत ११ आणि अखेरच्या तीन चेंडूत तर अवघ्या दोन धावा इतके सोपे आणि सहजसाध्य झाले होते. मर्यादित वीस षटकांच्या विश्व करंडक सामन्यातील ‘अ’ गटात न्यूझीलंडकडून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानला पराभूत करुन भारत बुधवारी बांगलादेशविरुद्ध बंगळुरुच्या चिन्नाप्पा स्टेडियममध्ये उतरला होता. आधी फलंदाजी करताना भारताचे फलंदाज तसे ढेपाळलेच. पण हा सामना कमी धावांचा राहील असे समीक्षक सांगत होते. तरीही आशियाई करंडकात पाकिस्तानला लोळवणारा बांगलादेशचा संघ लेचापेचा नसल्याचे त्याने अगोदरच दाखवून दिल्यामुळे विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य त्याच्या दृष्टीने असाध्य नव्हते. प्रत्यक्षात झालेही तसेच. सामना खरे तर त्या संघाने हाणतच आणला होता. भारतीय कर्णधार धोनी याची देहबोली त्याच्यातील अस्वस्थता दाखवून देत होती. सामना बरोबरीत सुटला तरी मिळवली अशीच प्रेक्षकांचीही प्रतिक्रिया होती. पण म्हणतात ना विजयासारखा विजयच. तरीही या सामन्याने आणि आशिया करंडकातील अंतिम सामन्याने एक बाब ठळकपणे दाखवून दिली आहे की क्रिकेटच्या मैदानावर भारत खेळतो तेव्हां आजवर केवळ पाकिस्तान समोर असतानाच ते धर्मयुद्ध होत असते आता पाकच्या जोडीला बांगलादेशदेखील धर्मयोद्धा ठरतो आहे!