शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सुचिन्ह मानावे ?

By admin | Updated: February 3, 2016 03:03 IST

‘पाकिस्तान सरकारने काश्मीरमधील घातपाती कृत्यांना अजिबात प्रोत्साहित करु नये आणि तिथे असे उद्योग करणाऱ्या प्रतिबंधित संघटनांवर कडक कारवाई करुन

‘पाकिस्तान सरकारने काश्मीरमधील घातपाती कृत्यांना अजिबात प्रोत्साहित करु नये आणि तिथे असे उद्योग करणाऱ्या प्रतिबंधित संघटनांवर कडक कारवाई करुन त्यायोगे आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मनातील चिंता दूर करावी’ असे आवाहन चक्क पाकिस्तानी संसदेतील परराष्ट्र धोरणविषयक स्थायी समितीच्या सदस्यांनी एका लेखी अहवालाद्वारे आपल्या सरकारला करावे हे उभय देशांदरम्यानच्या संबंधांमध्ये सकारात्मक बदल होण्याचे सुचिन्ह मानावे का, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. तथापि त्यांनी केलेल्या या शिफारसींमध्येच पाक आजवर काश्मीरातील घातपाती कृत्यांना प्रोत्साहन देत आल्याची आणि ज्या संघटनांवर बंदी आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याची स्वच्छ कबुलीदेखील आहे. भारताची त्या राष्ट्राकडे असलेली मागणी नेमकी याच संदर्भातली आहे. पाकिस्तानातील सत्ताधारी ‘पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ’ या पक्षाचे संसद सदस्य आवीस अहमद लेघारी यांच्या नेतृत्वाखालील या स्थायी समितीने आपल्या अहवालात असेही नमूद केले आहे की, भारतात दहशत माजविणाऱ्या (पाक पुरस्कृत?) शक्तींच्या विरोधात पाकिस्तान कोणतीच कारवाई करीत नाही, ही जी काही चिंता आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मनात उत्पन्न झाली आहे ती दूर करणे आवश्यक आहे. समितीने सरकारपुढे एक चार कलमी कार्यक्रमदेखील ठेवला आहे. भारताच्या पुढे केलेल्या सहकार्याच्या प्रस्तावास प्रतिसाद देणे, तणाव कमी करणे, चर्चा सुरु करणे आणि चांगला परिणाम साध्य करणे यांचा त्यात समावेश आहे. खुद्द पाकिस्तानची आजवरची भूमिका केवळ काश्मीर प्रश्नावरच चर्चा करु अशी आडमुठेपणाची राहिली आहे. तिला समितीने छेद दिला असून एकाचवेळी सर्व विषयांवर चर्चा करीत राहिले पाहिजे असे समितीने म्हटले आहे. हे विषय कोणते याचा तपशीलदेखील समितीने अहवालाद्वारे सादर केला आहे. त्यात समितीने काश्मीर, पाणी, व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या विषयांचा अंतर्भाव केला आहे. आजवर भारतात सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारची भूमिका प्रत्यक्षात हीच आणि अशीच राहिली आहे. काश्मीरचा प्रश्न जटील आहे व प्रदीर्र्घ चर्चेनंतरच त्यात तोडगा निघू शकतो हे उघड आहे. त्यामुळे तिथेच घोटाळत न राहाता व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर चर्चा करुन उभयपक्षी मान्य धोरणे निश्चित करावीत हीच भारताची भूमिका राहिलेली आहे. तिचा या पद्धतीने पाकिस्तानच्या संसदेतील एका महत्वाच्या समितीने स्वीकार करावा हे नाही म्हटले तरी निश्चितच स्वागतार्ह आहे. पण आजवरचा अनुभव लक्षात घेता समितीच्या शिफारसींना तेथील सरकार आणि विशेषत: तेथील लष्कर कितपत प्रतिसाद देईल याविषयी शंका वाटणे प्रस्तुत आहे. युद्धज्वराने आणि सूड भावनेने पेटलेल्या लष्कराला बाजूला सारुन त्या देशातील लोकनियुक्त सरकार स्वत:च्या मर्जीने काही ठाम निर्णय घेणार असेल तर तो एक इतिहासच ठरेल.