शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Education: पुन्हा घोका, पुन्हा ओका... परत तोच प्रश्न! किती टक्के पडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 11:14 IST

Education: पाचवी आणि आठवीसाठी आता ‘वार्षिक’ परीक्षा घेतल्या जाणार आहेत; पण मुलं, पालक आणि शिक्षकांनाही ‘म्हणजे नेमकं काय होणार?’ हे नीट कळलेलं नाही..

- अनन्या भारद्वाज  (लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)तसंही मुलांच्या परीक्षा म्हटलं की पालकांना लगेच टेन्शन येतं. स्वत:च्या बोर्डाच्या परीक्षेत आलं नव्हतं तेवढं. मुलाच्या नर्सरीच्या रिझल्टचा किस पाडणारे पालक आपल्या अवतीभोवती आहेतच. (आपण नाही त्यातले असं म्हणत कितीही नाकं मुरडली तरी बहुसंख्य त्यातच असतात.) त्यात चर्चा म्हणून आपल्याकडे मोठमोठे शब्द फेकले जातात आनंददायी आणि मूलकेंद्री शिक्षण, इनोव्हेशन, न्यू एज लर्निंग, क्रिएटिव्हिटी.. आपलं मूल फार कल्पक, हुशार आणि इनोव्हेटिव्ह व्हावं, असं पालकांनाही  वाटतं. (मूल पोटात असल्यापासून त्यासाठी त्यांचे संस्कारात्मक प्रयत्न सुरू झालेले असतात.) शैक्षणिक धोरण ठरवणाऱ्यांपासून शासनापर्यंत सगळ्यांचीच दांडगी इच्छा की उद्याचे स्टिव्ह जॉब्ज, झुकरबर्ग, इलॉन मस्क आपल्याच देशात जन्माला यावेत. मात्र, त्यासाठी आपल्या शिक्षण व्यवस्थेत पूर्वापार चालत आलेल्या एक प्रश्नाचं काय करणार याचं उत्तर मात्र एआयच्या जमान्यातही सापडलेलं नाही. तो प्रश्न एकच, किती टक्के मिळाले?      

हव्या त्या अभ्यासक्रमाला, हव्या त्या संस्थेत प्रवेश हवा तर गुणवत्ता दर्शवणारी गोष्ट एकच, मार्क्स! स्पर्धा पॉइण्ट पॉइण्टने असते. पैशाचं पाठबळ प्रत्येकाकडे असतंच असं नाही आणि शैक्षणिक कर्ज घेण्याची ऐपतही व्यक्तीपरत्वे कमी- जास्त असते. शिक्षणाशिवाय भवितव्य नाही या एकाच वाक्याभोवती पालक रक्ताचं पाणी करत फिरत असतात. आणि आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होता होता नवाच परीक्षा सिलॅबस समोर येऊन उभा ठाकला आहे.नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता इयत्ता पाचवी आणि आठवी इयत्तांसाठी संपूर्ण अभ्यासक्रमानुसार ‘वार्षिक’ परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यात मूल नापास झाल्यास तीन महिन्याने पुन्हा परीक्षा, त्यातही अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थी पुढच्या वर्गात जाणार नाही.निर्णय तर झाला आहे आणि यंदा त्याची अंमलबजावणी होणार इतपत माहिती पालकांपर्यंत आली आहे. नेहमीप्रमाणे परीक्षा म्हणताच किती टक्के पडणार या प्रश्नाने दचकणारे पालक जागे झाले आहेत. मात्र, परीक्षा कोण घेणार, शाळा घेणार की कुठले बाहेरचे बोर्ड असणार, पेपर कोण काढणार, याबाबत पालकांना (आणि शिक्षक, संस्थाचालकांनाही) विशेष काहीही माहिती नाही. माध्यमांत धोरणात्मक चर्चा खूप दिसते; पण ज्यांची मुलं या परीक्षा देणार त्यांना नेमकं काय होणार आहे हेच अद्याप कळू शकलेलं नाही.

परिणाम म्हणजे पालकांनी शाळा सुरू होताच क्लास शोधणं सुरू केलं. कोरोनाकाळात दोन वर्षे ऑनलाइन शिकून एमसीक्यू टीक करायला शिकलेल्या मुलांना आधीच लिहिण्याचा सराव नाही. बहुतेकांना लिहिण्याचा कंटाळाच आहे. लिहिणे म्हणजे शिक्षण नाही आणि प्रावीण्यही नाही हे तत्त्व म्हणून घटकाभर मान्य केलं तरी उत्तरपत्रिकेत तर मुलांना लिहावंच लागणार. ते आपल्या मुलांना जमेल का या चिंतेनं पालकांना छळायला सुरुवात केली आहे. कोरोनाकाळात झालेला ‘एज्युकेशन लॉस’ कितपत भरून आला हे सरकारीच काय; पण खासगी (महागड्या) शाळांतही कुणी ठोसपणे सांगू शकणार नाही. खासगी शाळा परीक्षा तर घेत होत्याच; पण नापास कुणी करत नव्हते. नव्या संदर्भात ‘नापास’ हा शब्द फिरून आयुष्यात आला आहे.

आधीच आपली शिक्षणव्यवस्था चुकण्याची, अपयशी होण्याची संधी देत नाही, कारण प्रयोगाला काही वावच नाही. नवी व्यवस्था पुन्हा घोका आणि ओका टप्प्यावर स्मरणशक्ती आणि लिहिण्याची चाचणी ठरणार का? बाकी वंचित- गरीब घरातल्या मुलांच्या वाट्याला यातून कोणते प्रश्न येणार हा तर अजूनच वेगळा विषय.

तूर्तास पालक आणि मुलांसमोरची प्रश्नपत्रिका बदलली आहे, जे समोर ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, माध्यम आणि समाजमाध्यमांचा स्फोट झालेल्या अतिरेकी कम्युनिकेशनच्या जगात नवा निर्णय आणि अंमलबजावणीची  माहिती पालक आणि मुलांपर्यंत पोहाेचवावी असे निर्णयकर्त्यांना वाटत नाही आणि चर्चा मात्र मूलकेंद्री शिक्षणाची! अजबच आहे! 

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी