शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

अग्रलेख: हा रस्ता कुठे जाणार? फेरविचार न केल्यास रस्त्यावरील मृत्यूचे तांडव अटळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 08:02 IST

मनाला सुन्न करणाऱ्या एक ना अनेक दुर्घटना रस्त्यांवरील अपघातांमुळे दररोज घडत आहेत

बड्या बापाच्या मद्यधुंद मुलाने काही महिन्यांपूर्वी पुण्यातल्या कल्याणीनगर भागात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या तरुण-तरुणीला चिरडले होते. परवा रविवारी मध्यरात्री एका मद्यधुंद डंपर चालकाने, झोपलेल्या नऊ मजुरांना वाघोलीत चिरडले. त्यात वर्षभराच्या चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाला. सहाजण गंभीर जखमी आहेत. अमरावतीवरून पुण्यात आलेल्या या नऊजणांना वाघोली केसनंद परिसरात डंपरने चिरडले. पोटासाठी विदर्भातून पुण्यात मुक्काम हलवलेल्या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने त्यांना चिरडले. तो डंपर दुसऱ्या बाजूला वळला असता तर आणखी अनेकांचा बळी गेला असता. या मजुरांना कोणी चिरडलं? या तिघांना नेमकं कोणी मारलं? यात चूक कोणाची? मद्यधुंद चालकाची की दारू प्याल्यावरही स्टिअरिंग हाती घेता येते, ही हिंमत देणाऱ्या यंत्रणेची? मुद्दा एवढाच नाही. ही घटना म्हणजे आपल्या देशाचा एक चेहरा आहे. एरवी विकासाच्या नावाने आपण फार बोलत असतो. मात्र, ज्या देशात कष्टकरी मजुरांना रस्त्यावर झोपावे लागते, त्याचे काय करणार? कोरोनाच्या कालावधीत करमाडजवळ कामगारांना भरधाव रेल्वे चिरडते आणि त्यांची भाकरी इतस्ततः फेकली जाते. याचे काय करणार? हा समन्यायी विकास आहे का? दिवसभर काबाडकष्ट करून झोपलेल्या कुटुंबाला चिरडले जाते आणि धनदांडग्यांच्या पोराने खून करूनही त्याला निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली जाते. हा विकास आहे का? पुण्यात रविवारी मध्यरात्री घडलेल्या दुर्घटनेमुळे दोघांसह वर्षभराच्या चिमुकलीचे डोळे कायमचे मिटले. मनाला सुन्न करणाऱ्या एक ना अनेक दुर्घटना रस्त्यांवरील अपघातांमुळे दररोज घडत आहेत. राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे दररोज लोकांचे जीव जात आहेत. एवढे होऊनही यंत्रणा अशी बेमुर्वतखोर आहे की पाण्यावर तरंग नाही! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत बोलताना सांगितले होते, ‘रस्ते अपघातांबाबत आपल्या देशाची स्थिती इतकी वाईट आहे की, आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये मला तोंड लपवावे लागते.’ रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. इतर देशांमध्ये शालेय वयापासून वाहतुकीचे नियम पाळण्याचे संस्कार केले जातात. अतिशय कठोर कारवाई नियम तोडणाऱ्यांवर केली जाते. आपल्याकडे ‘सिव्हिक सेन्स’चा अभाव अनेक ठिकाणी दिसतो. या संदर्भातही चित्र फार वेगळे नाही. कायद्याचा धाक नसल्याने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’मुळे नियमितपणे अपघात होतात. वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होते. त्यामुळे राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. एक जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान राज्यात एकूण १४ हजार १७० अपघात झाले. त्यात ११ हजार ८९८ नागरिक जखमी, तर सहा हजार २२९ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यात महिलांच्या मृत्यूची संख्या तुलनेने बरीच जास्त आहे. २०२१ मध्ये एक हजार ३६८, २०२२ मध्ये एक हजार ६३२, २०२३ मध्ये एक हजार ८६७, तर जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान एक हजार ४५९ महिलांचा मृत्यू झाला. देशपातळीवरील अपघातांच्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘भारतातील रस्ते अपघात’ यावर गेल्या वर्षी अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यातली आकडेवारी भयंकर आहे. २०२२ मध्ये चार लाख ६१ हजार अपघात झाले असून, त्यामध्ये एक लाख ६८ हजार व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. यात चार लाख ४३ हजार जखमी झाले आहेत. आधीच्या वर्षातील आकडेवारीशी तुलना करता, या अहवालानुसार अपघातात ११.९ %, मृत्यूंमध्ये ९.४% तर जखमींच्या प्रमाणात १५.३% वाढ झाली आहे. दरवर्षी सरासरी एक लाख ७८ हजार लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. त्यापैकी १८ ते ३४ वयोगटातील ६० टक्के आहेत. जिवाशी खेळणारी दररोजची अपघातांची मालिका आपल्याला कमी करायची असेल तर शालेय जीवनापासून वाहतूक नियमांचे पालन किती महत्त्वाचे, हे अभ्यासक्रम तयार करून शिकवावे लागेल. ‘ड्रायव्हिंग लायसन्स’संदर्भात नियम आणखी कडक करावे लागतील. नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी लागेल. मद्यधुंद चालकांचे वाहन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. मात्र, हे सर्व करण्याची क्षमता असलेली यंत्रणा कुंभकर्णी झोपेत असल्याचे निराशाजनक चित्र आहे. यासाठी विकासाच्या प्रारूपाचाच एकदा फेरविचार केला पाहिजे. अन्यथा रस्त्यावरील मृत्यूचे तांडव अटळ आहे.

टॅग्स :AccidentअपघातPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघात