शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 05:08 IST

गेले काही दिवस देशातल्या अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू आहे. विमाने रद्द झाली आहेत. काही उशिरा सुटत आहेत. लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. अनेकांना महत्त्वाच्या कार्यक्रमांना जाता आले नाही.

गेले काही दिवस देशातल्या अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू आहे. विमाने रद्द झाली आहेत. काही उशिरा सुटत आहेत. लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. अनेकांना महत्त्वाच्या कार्यक्रमांना जाता आले नाही. विमान रद्द झाल्याने वधू-वर स्वतःच्याच लग्नाच्या स्वागत-समारंभाला पोहोचू शकले नाहीत. प्रवाशांचे हाल होत आहेत. विमानतळांवर अराजक असल्यासारखे चित्र आहे. गेल्या आठवड्यापासून इंडिगो कंपनीची विमानसेवा विस्कळीत झाली आणि इतर विमान कंपन्यांनी अव्वाच्या सव्वा दर आकारायला सुरुवात केली. हैदराबाद, मुंबई, बंगळुरू, जयपूर, दिल्ली आणि पुणे या व्यस्त विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जाता-येताना विलंब, सामान घेताना विलंब आणि मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या तिकीट दरांचाही सामना करावा लागत आहे.

इंडिगो कंपनीच्या परिस्थितीचा गैरफायदा स्पर्धक कंपन्यांनी घेतल्याचे उघड आहे. इंडिगो कंपनीच्या विमानसेवेचा गोंधळ का उडतो आहे, यावरही विचार करणे महत्त्वाचे. एक तर, या कंपनीचे नेटवर्क व्यापक स्वरूपाचे आहे. दुसरे असे की, रात्रीच्या प्रवासासाठी याच कंपनीला प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. भारतात दर दहा प्रवाशांपैकी सहा प्रवासी इंडिगो कंपनीच्या विमानात बसतात. वैमानिकांसह केबिन क्रू कर्मचाऱ्यांची नऊ हजारांपेक्षा जास्त संख्या असणाऱ्या इंडिगो विमान प्रवासी वाहतूक कंपनीविरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळल्याचे चित्र आहे. कंपनी कोणतीही असो किंवा देश कोणताही असो, विमानसेवा विस्कळीत होण्याचा परिणाम संबंधित कंपनी आणि प्रवासी यांच्यापुरताच मर्यादित नसतो. प्रवासी घरून विमानतळावर पोहोचण्यापासून ते परतीच्या प्रवासानंतर विमानतळावरून इच्छितस्थळी पोहोचण्यापर्यंतच्या काळाचा संबंध याच्याशी असतो. या काळात विमान प्रवासी ज्या-ज्या घटकांना आर्थिक उलाढालींच्या अंगाने स्पर्श करतो, अशा पेट्रोलपंप, हॉटेल्स, रिक्षा, कॅब, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन कंपन्या अशा सर्व पूरक घटकांना विमानसेवा अनियमिततेचा फटका बसला आहे, बसतो आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या इंडिगो विमान कंपनीची ४३४ विमाने देश-परदेशात नियमित उड्डाण करतात. या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाचे तास हे आठ ते दहा इतके होते. वाढत्या कामाचा ताण कमी करण्यासाठी 'डीजीएसए' (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) यांनी दहा तासांवरून सहा तास अशी कामाच्या वेळेत कपात केली.

त्यानुसार संगणकीय प्रणालीत बदल झाल्यानंतर काम संपताच नियमानुसार वैमानिकांसह इतर विमान कर्मचारी सहा तासांनंतर आपले काम थांबवू लागले. त्याचा परिणाम इंडिगो विमानसेवा ठप्प होण्यात झाला. याचा फटका सर्वच विमान कंपन्यांना बसला. मात्र, मोठे नेटवर्क असल्याने इंडिगोची यंत्रणाच कोलमडली. सर्व स्तरांवरून इंडिगो कंपनीविरोधात टीकेची राळ उठली, तेव्हा मात्र कर्मचाऱ्यांच्या कामांचे तास कमी करण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला. कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी कामांचे तास कमी करणे हा पर्याय योग्य असला, तरी विमान कंपनीच्या विमानांची संख्या, दैनंदिन उड्डाणे आणि सरासरी प्रवासी संख्या या बाबींच्या निकषावर केबिन क्रू आणि वैमानिकांची संख्या पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. आता या गोंधळाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू सांगत असले आणि काही मलमपट्टया केल्यासारखे दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात सेवा नियमित आणि सुरळीत केव्हा होणार, याबाबत अद्यापही शंकाच आहे. एखाद्या विमान कंपनीची सेवा विस्कळीत झाल्यावर तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याची सरकारी भूमिका विमान प्रवाशांना नको आहे. भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत, यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि विमान कंपन्यांचे प्रशासन यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे.

 'फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन'चा नियम (एफटीडीएल) १ जुलैपासून लागू केल्यानंतर विमान कंपन्यांना वैमानिकांना आठवड्यातून ४८ तास विश्रांती देणे बंधनकारक करण्यात आले होते. 'डीजीसीए'ने क्रू मेंबरसह वैमानिकांच्या सलग रात्रपाळीवरही बंदी घातली होती. गेल्या आठवड्यापासूनच्या विमानसेवेच्या गोंधळानंतर आता साप्ताहिक विश्रांतीचा नियम मागे घेऊन आठवड्यात ४८ ऐवजी ३६ तास विश्रांतीचा नियम पूर्ववत करण्यात आला आहे. तो प्रत्यक्षात येईपर्यंत इंडिगोच्या विमान प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. एकाच कंपनीच्या घशात सगळे कोंबण्याची एकचालकानुवर्ती भांडवली व्यवस्था किती घातक आहे, याचा हा पुरावा. विकासाच्या मोठमोठ्या हवाई गप्पा मारणाऱ्या सत्ताधीशांना या अराजकाने जमिनीवर आणले आहे. त्यातूनही धडा घेतला नाही, तर विकासाचे आपले स्वप्न हवेतच विरणार आहे !

English
हिंदी सारांश
Web Title : Grounded Airlines: Flight Cancellations Cause Chaos, Passenger Distress at Airports

Web Summary : Flight disruptions, especially with Indigo, have caused widespread airport chaos, leaving passengers stranded and impacting related industries. Staffing issues and regulatory changes contributed to the crisis, prompting government intervention and renewed scrutiny of airline operations.
टॅग्स :Indigoइंडिगोairplaneविमान