शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच्या पायावरच प्रहार? मतदारयादीची विश्वसनीयता हाच निवडणूक प्रक्रियेचा मूलाधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 07:03 IST

निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’चा  ओनामा केल्यापासूनच, या विषयावर सातत्याने गदारोळ सुरू आहे. बिहार विधानसभेची निवडणूक त्या सावटाखालीच पार पडली.

पश्चिम बंगालमध्ये मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) कामादरम्यान मतदान केंद्र पातळीवरील अधिकाऱ्यांना (बीएलओ) दिल्या जात असलेल्या धमक्यांची गंभीर दखल घेत, परिस्थिती खूप गंभीर असून, निवडणूक आयोगाने परिस्थिती हाताळावी; अन्यथा अराजकता निर्माण होईल, हा जो इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, तो या मुद्द्याशी निगडित सर्वच घटकांनी अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ‘बीएलओ’ हे काही निवडणूक आयोगाचे पूर्णवेळ कर्मचारी नसतात. राज्य सरकारच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांकडेच ती अतिरिक्त जबाबदारी सोपवली जात असते. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांचाच भरणा असतो. खालच्या पातळीवर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांकडे साधनसामग्री, अधिकार आणि संरक्षण या तिन्ही घटकांची कमतरता असते; पण लोकशाहीचा पाया टिकवण्याची सर्वांत मोठी जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर असते! त्यामुळे ‘बीएलओ’वरील प्रहार म्हणजे लोकशाहीच्या पायावरच प्रहार म्हणावा लागेल! मतदारयादीची विश्वसनीयता हाच निवडणूक प्रक्रियेचा मूलाधार आहे. मूलाधारच ढासळायला सुरुवात झाली, तर संपूर्ण इमारतच नाजूक होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा रोष अगदी स्वाभाविक आणि आवश्यक म्हणावा लागेल.

 निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’चा  ओनामा केल्यापासूनच, या विषयावर सातत्याने गदारोळ सुरू आहे. बिहार विधानसभेची निवडणूक त्या सावटाखालीच पार पडली. आता पश्चिम बंगालमध्ये काही भागांत ‘बीएलओं’ना प्रवेश न देणे, घरोघरी जाऊन करावयाच्या पडताळणीत अडथळे आणणे, स्थानिक कार्यकर्त्यांकडून धमक्या आणि प्रशासनाकडून वेळेवर संरक्षण न मिळणे, इत्यादी तक्रारी न्यायालयात समोर आल्या. ‘बीएलओं’चे तटस्थ कामच निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुकीची हमी असते. त्यामुळे ‘बीएलओं’ना धमक्या मिळत असतील, त्यांच्या कामात अडथळे निर्माण केले जात असतील, तर असे प्रकार करणाऱ्यांना निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक नको आहेत, असा त्याचा अर्थ होतो. दुसऱ्या बाजूला, ‘बीएलओ’ची जबाबदारी पार पाडत असलेले कर्मचारीच कोणत्या तरी राजकीय विचारधारेने प्रेरित असतील, तर त्याचाही विपरीत परिणाम मतदारयाद्या निर्दोष करण्याच्या कामावर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, राज्य प्रशासनाने ‘बीएलओं’ना संरक्षण न दिल्यास निवडणूक आयोगाने स्वतः कडक पावले उचलावीत, अशी स्पष्ट सूचना न्यायालयाने केली आहे.

राज्य सरकारांनी निवडणूक आयोगाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे; अन्यथा स्थानिक पोलिसांना प्रतिनियुक्तीवर घेण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही, असे आयोगाच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. परिस्थिती सुधारलीच नाही, तर केंद्रीय दलांना पाचारण करावे लागेल, अशी भूमिकाही आयोगाने घेतली; परंतु प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होईपर्यंत आयोग पोलिसांना त्यांच्या अधिकारक्षेत्रात घेऊ शकत नाही, असे न्यायालयाने बजावले. आयोगाच्या या भूमिकेमागे केवळ ‘एसआयआर’ सुरळीत पार पाडणे, एवढाच उद्देश आहे की, काही वेगळाच वास येत आहे, आयोगावर काही दबाव आहे का, हेदेखील न्यायालयाने तपासायला हवे. निवडणूक प्रक्रिया राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असावी, हा न्यायालयाचा आग्रह योग्यच; पण काही राज्यांना तो त्यांच्या अधिकारांतील हस्तक्षेप वाटू शकतो.

शिवाय राजकीय हस्तक्षेप राज्यात सत्तेत असलेल्या विरोधी पक्षाकडूनच होतो, असे कसे म्हणता येईल? उद्या केंद्रीय पोलिस दल वापरण्याची निवडणूक आयोगाची भूमिका मान्य झाल्यास, केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाकडून हस्तक्षेप होणार नाही, याची हमी काय? शिवाय ‘बीएलओं’च्या सुरक्षेसाठी केंद्रीय पोलिस यंत्रणा वापरण्याच्या शक्यतेमुळे भविष्यात केंद्र-राज्य संबंधांमध्ये नवा चर्चाविषय निर्माण होईल. निवडणूक आयोगाचे अधिकार वाढवताना, कायदा-सुव्यवस्थेतील राज्यांच्या भूमिकेची जाण ठेवणेही गरजेचे ठरणार आहे. ‘बीएलओं’च्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाला वाटत असलेली चिंता रास्तच आहे; पण केवळ केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या विरोधातील पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांतच निवडणूक आयोगाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव येतो, त्यांच्या कामात हस्तक्षेप होतो, ही सरधोपट मांडणी होईल. हा प्रश्न केवळ ‘एसआयआर’पुरता मर्यादित नाही, तर निवडणूक आयोगाच्या सर्वच कामांशी निगडित आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत निवडणूक आयोगाला दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील. त्या नेमक्या कोणत्या असाव्यात, हे न्यायालयच सांगू शकेल; पण कोणतीही निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडणे, हेच निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे, हे आयोगाने विसरू नये  आणि ते पार पाडण्यात कसूर करू नये!

English
हिंदी सारांश
Web Title : Attack on Democracy's Foundation? Court Concerns Over West Bengal Elections.

Web Summary : The Supreme Court's warning about threats to election officials in West Bengal highlights concerns over the integrity of the electoral process. Protecting these officials, crucial for fair elections, is paramount; failure risks undermining democracy itself. The court urges action to ensure impartiality.
टॅग्स :Electionनिवडणूक 2025